भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी (१३ मे) विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनमधील श्री राधा केळीकुंज आश्रमात पोहोचला. तिथं त्यांनी संत प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान कोहली आणि अनुष्कानं त्यांच्याशी काही काळ चर्चादेखील केली.
विराट कोहलीने याआधी ४ जानेवारी २०२३ रोजी पहिल्यांदा संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली होती. त्यानंतर १० जानेवारी २०२५ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा आश्रमात हजेरी लावली होती. विराट कोहलीने बाराह घाटाजवळ राहणाऱ्या संत प्रेमानंदांच्या गुरू गौरांगी शरण यांनाही भेट दिली.
२०२५ च्या आयपीएलमध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. भारत-पाकिस्तान वादामुळे आयपीएल काही काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. १७ मे रोजी लीग पुन्हा सुरू होणार असून, या दिवशी बंगळूरू संघाचा सामना आहे.
आरसीबी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी सामना करेल. ११ सामन्यांमध्ये ५०५ धावा काढणारा विराट कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या नावावर ५१० धावा आहेत.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेट रामराम ठोकला आहे. तो फक्त आता एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याने १२३ सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या बॅटने ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली.
विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ७ द्विशतके ठोकली जी एक विक्रम आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विराटने कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक ४० कसोटी सामने जिंकले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.