Chief Minister Pushkar Singh Dhami  Dainik Gomantak
देश

Uttarakhand: स्थलांतर रोखण्यासाठी उत्तराखंड सरकारचा मेगा प्लॅन

Uttarakhand News: उत्तराखंडमधील गावांमध्ये स्थलांतर ही गंभीर समस्या आहे.

दैनिक गोमन्तक

Uttarakhand News: उत्तराखंडमधील गावांमध्ये स्थलांतर ही गंभीर समस्या आहे. तर दुसरीकडे, स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याच क्रमाने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ग्राम विकास आयोगाची बैठक घेतली. या बैठकीत स्थलांतर निवारण आयोग स्थापन करण्याच्या दिशेने काम करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

दरम्यान, आयोगाची बैठक घेताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक ग्रामसभेत एका व्यक्तीची नियुक्ती करावी, जो तेथील सर्व समस्या सोडवण्यासाठी तत्पर असावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर स्थलांतर रोखण्यासाठी आणि गावातच रोजगार (Employment) आणि व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, या भेटीची माहिती सीएम धामी यांनी ट्विट करुन दिली. ट्विटमध्ये मुख्यमंत्री धामी म्हणाले, 'आज सचिवालयात ग्रामीण विकास आणि स्थलांतर आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयोगाने अहवालाद्वारे ज्या काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना प्रत्यक्षात आणण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.' ते पुढे म्हणाले, 'ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर रोखण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या आयोगाचे नाव स्थलांतर प्रतिबंधक आयोग असेल. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘एक गाव, एक सेवक’ या संकल्पनेवर काम केले जाणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT