Ashish Mishra Dainik Gomantak
देश

lakhimpur Case: मुख्य आरोपी असणाऱ्या आशिष मिश्राची झाली सुटका

लखीमपूरमधील शेतकर्‍यांना चिरडल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्राची तुरुंगातून सुटका झाली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याची उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी मंगळवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. हायकोर्टाने पाच दिवसांपूर्वी त्याच्या जामीनाचे आदेश दिले होते. या प्रकरणी आशिष मिश्रा हा लखीमपूर प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आशिष मिश्राला जामीनाचा आदेश 10 फेब्रुवारीला देण्यात आला. आणि आज 15 फेब्रुवारीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Union Home Minister's son Ashish Mishra released from jail for crushing farmers in Lakhimpur)

दरम्यान, आशिष मिश्राचे वकील अवधेश कुमार सिंग यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, न्यायालयाकडे प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या दोन जामीनांची मागणी केली होती, परंतु शहराबाहेर जाण्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत.

तसेच, आशिष मिश्राच्या जामीनाचा आदेश देताना उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मारेकरी घटनास्थळी उपस्थित असल्याच्या पोलिस कथेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचवेळी राजकीय पक्षांनी आशिष मिश्राच्या जामीनाबाबत योगी सरकार आणि पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र आता मारेकऱ्याला जामीन मिळाल्याने सरकार आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याचे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही म्हटलयं की, एकीकडे शेतकऱ्यांना कारने चिरडणाऱ्या आरोपींना जामीन मिळतो, तर म्हशी चोरी, गाड्या चोरीच्या आरोपाखाली निष्पाप लोकांना तुरुंगात डांबले जाते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने पोलिसांचा तपास फेटाळून लावला होता. आशिष मिश्राला जामीन देण्याच्या आदेशात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोर्टाने म्हटले होते की, 'एफआयआरमध्ये आशिष मिश्राचा उल्लेख गोळीबार करणारा असे करण्यात आले होते, परंतु कोणालाही गोळी लागली नाही. आंदोलकांना चिरडण्यासाठी वाहनाचा चालक भडकावणारा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चालक आणि इतरांना आंदोलकांनी मारले होते.'

शिवाय, कलम 144 लागू असतानाही हजारो लोकांची गर्दी कशी काय झाली, असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला विचारणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Repair: 'नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्ते उत्तम स्थितीत', मंत्री कामतांनी दिली ग्वाही; रस्ता खोदणाऱ्यांसाठी दिला इशारा

Exam Paper Issue: 3रीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ! विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसल्याचा दावा; पालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

‘ही अतिशय दुर्दैवी स्थिती', सेवानिवृत्तांना मुदतवाढ देण्याच्या प्रथेबद्दल कोर्टाचे ताशेरे; यंत्रणेचे मनोबल खच्ची केल्याचा ठपका

Lotulim Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

SCROLL FOR NEXT