lakhimpur Case: मुख्य आरोपी असणाऱ्या आशिष मिश्राची झाली सुटका

लखीमपूरमधील शेतकर्‍यांना चिरडल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्राची तुरुंगातून सुटका झाली आहे.
Ashish Mishra
Ashish MishraDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याची उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी मंगळवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. हायकोर्टाने पाच दिवसांपूर्वी त्याच्या जामीनाचे आदेश दिले होते. या प्रकरणी आशिष मिश्रा हा लखीमपूर प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. आशिष मिश्राला जामीनाचा आदेश 10 फेब्रुवारीला देण्यात आला. आणि आज 15 फेब्रुवारीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Union Home Minister's son Ashish Mishra released from jail for crushing farmers in Lakhimpur)

दरम्यान, आशिष मिश्राचे वकील अवधेश कुमार सिंग यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, न्यायालयाकडे प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या दोन जामीनांची मागणी केली होती, परंतु शहराबाहेर जाण्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत.

Ashish Mishra
lakhimpur Case: मुख्य आरोपी असणाऱ्या आशिष मिश्राची झाली सुटका

तसेच, आशिष मिश्राच्या जामीनाचा आदेश देताना उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मारेकरी घटनास्थळी उपस्थित असल्याच्या पोलिस कथेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचवेळी राजकीय पक्षांनी आशिष मिश्राच्या जामीनाबाबत योगी सरकार आणि पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र आता मारेकऱ्याला जामीन मिळाल्याने सरकार आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याचे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले होते. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही म्हटलयं की, एकीकडे शेतकऱ्यांना कारने चिरडणाऱ्या आरोपींना जामीन मिळतो, तर म्हशी चोरी, गाड्या चोरीच्या आरोपाखाली निष्पाप लोकांना तुरुंगात डांबले जाते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने पोलिसांचा तपास फेटाळून लावला होता. आशिष मिश्राला जामीन देण्याच्या आदेशात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोर्टाने म्हटले होते की, 'एफआयआरमध्ये आशिष मिश्राचा उल्लेख गोळीबार करणारा असे करण्यात आले होते, परंतु कोणालाही गोळी लागली नाही. आंदोलकांना चिरडण्यासाठी वाहनाचा चालक भडकावणारा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चालक आणि इतरांना आंदोलकांनी मारले होते.'

शिवाय, कलम 144 लागू असतानाही हजारो लोकांची गर्दी कशी काय झाली, असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला विचारणा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com