हिंसाचार Dainik Gomantak
देश

West Bengal: निवडणुकीत हिंसाचार का झाला उत्तर द्या- सुप्रीम कोर्ट

पश्चिम बंगालमधील(West Bengal) मतदानानंतरच्या हिंसाचाराबद्दल सुप्रीम कोर्टाने ईसी, केंद्र सरकार आणि राज्याकडून पउत्तर मागितले आहे .

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमधील (West Bengal) मतदानानंतरच्या हिंसाचाराबद्दल सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) ईसी, केंद्र सरकार(Central Government) आणि राज्याकडून पउत्तर मागितले आहे .

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराची(West Bengal Violence) एसआयटी चौकशी, पीडितांना नुकसान भरपाई किंवा आर्थिक मदत आणि सुरक्षा पुरविण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल आणि केंद्राला नोटीस बजावली आहे.

या याचिकेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पक्षकार म्हणून करण्यात आले आहे, परंतु त्यांना कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बरीच शहरे, आणि खेड्यांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि अशा अनेक घटनांची कारणेनेमकी काय होती तसेच या कारणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर कोर्टाने केंद्र, पश्चिम बंगाल सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून त्यांना चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अशी मागणी केली गेली होती की ज्या लोकांनी घरे सोडली आहेत आणि आसाम किंवा इतर राज्यात विस्थापित झाले अशा लोकांचे पुनर्वसन करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात यावेत.असेही या याचिकेत सांगण्यात आले होते.तसेच त्याशिवाय केंद्र सरकारला निमलष्करी दलाला सैन्य दलात तैनात करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली होती . त्यासोबतच विधानसभा निवडणुकीनंतर 2 मेपासून सुरू झालेल्या राजकीय हिंसाचाराची कोर्टाच्या देखरेखीखाली सर्व पीडितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश एसआयटीकडून मागविण्यात येण्याची मागणीही करण्यात आली होती.

याच याचिकेवर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकार, राज्य सरकाची कां उघाडणी करत या सगळ्यांबाबत चार आठवड्यांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT