S 400 Missile.jpg 
देश

भारताला लवकरच मिळणार 'आयर्न डोम' सारखे सुरक्षा कवच; रशिया देणार S-400 क्षेपणास्त्र

दैनिक गोमंतक

येणाऱ्या डिसेम्बर महिन्यापर्यंत भारताच्या (India) हवाई सुरक्षेत (security) आणखीन भर पडणार असल्याचे समजते आहे. भारताच्या भूभागावरून हवाई हल्ला (Attack) करण्याची क्षमता असणाऱ्या अत्याधुनिक (Advance) एस-400 (S-400) मिसाईल (Missile) डिसेम्बर पर्यंत भारतात पोहोचणार आहे. रोसोबोरॉनएक्स्पोर्टचे (Rosoboronexport) सीईओ अलेक्झेन्डर मिखेयेव यांनी सर्वकाही नियोजीत वेळे प्रमाने सूरु आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे. एस-400 मिसाईल भूभागावरून हवेत दूर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ट्रायम्फ मिसाईल प्रणाली 400 किमी दूर पर्यंत शत्रूच्या विमानावर मारा करू शकते. (S-400 missile will arrive in India in December)

भारताला मिळणारे हे क्षेपणास्त्र रशियाची (Russia) आतापर्यंतची सर्वात प्रगत सुरक्षा यंत्रणा आहे. भारताचे सुरक्षातज्ञ रशियाला पोहोचले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. ट्रायम्प मिसाईल प्रणाली हवाई क्षेत्रात तब्बल 400 किमी पर्यंत हल्ला करून विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट करू शकते. भारतीय सुरक्षा तज्ञांनी रशियामध्ये जाऊन हे क्षेपणास्त्र वापरण्यासाठीचे प्रशिक्षण सुरु केले आहे.    

या क्षेपणास्त्राबद्दलच्या विशेष गोष्टी 
1. दूरवर मारा करण्याची अत्याधुनिक प्रणाली असणारे हे क्षेपणास्त्र 400 किमी पर्यंत मारा करू शकते. 
2. या क्षेपणास्त्रातून 40 किमी, 120 किमी, 250 किमी आणि 400 किमी अशा वेगवगेळ्या अंतरावर मारा करता येतो. 
3. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून एकाचवेळी तीन वेगवेगळ्या दिशांना मारा केला जाऊ शकतो. 
4. या क्षेपणास्त्राच्या प्रत्येक टप्प्यात 72 क्षेपणास्त्राचा समावेश असतो. 
5. हे क्षेपणास्त्र कार्यरत करण्यासाठी फक्त 5  ते 10 मिनिटांचा वेळ लागतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT