Vladimir Putin and PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

Russia-Ukraine War: युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींची रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी दुसऱ्यांदा चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी चर्चा केली आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना दिले. (Russia Ukraine War Prime Minister Modi's second talks with Russian President during the war)

खार्किवमध्ये (Kharkiv) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल पीएम मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा केली. रशियाने खार्किव ताब्यात घेतल्याचा दावा देखील केला आहे. खार्किवमध्ये अजूनही मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी रशियन सैन्य आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे पुतीन यांनी त्यावेळी म्हटले आहे.

त्यांनी असेही म्हटले आहे की आम्ही तेथून भारतीय विद्यार्थ्यांच्या एका टीमला विशेष कॉरिडॉरद्वारे रशियाला ताबडतोब बाहेर काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांना आम्हांला लवकर आणि सुरक्षितपणे भारतात परत पाठवता येईल. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेन सरकारवर भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा आरोप देखील केला.

रशियन रणगाड्यांना रोखण्यासाठी युक्रेनकडून भारतीय विद्यार्थ्यांचा वापर केला जात असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेन युद्धाची दुसरी वेळ आहे. युद्धादरम्यान पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी पुतीन यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा आग्रह धरला होता.

यावेळी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या (Indian Students) सुरक्षित परतण्याबाबतही चर्चा केली आहे. पहिल्यांदाच पीएम मोदी आणि रशियाच्या (Russia) राष्ट्राध्यक्षांमध्ये सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली आहे. त्यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनमधील ताज्या परिस्थितीची माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे, ऑपरेशन गंगा अंतर्गत, भारत सरकार युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, भारत सरकारने आतापर्यंत 17 हजार भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणले गेले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही लवकरच मायदेशी आणले जाईल, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाने यावेळी केला आहे.

तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही पत्रकार परिषदेत सांगितले होते की, बुखारेस्टहून एक विमान आज रात्री दिल्लीला पोहोचणार आहे. याशिवाय बुखारेस्ट, बुडापेस्ट आणि पोलंड येथूनही उड्डाणे दिल्लीला येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने खार्कीव सोडण्याबाबत सूचना जारी केल्यानंतर काही विद्यार्थी खार्किव सोडण्यात यशस्वी झाल्याचे बागची यांनी सांगितले आहे.

अरिंदम बागची यांनी सांगितले की, लोकांना मोल्दोव्हाहून बुडापेस्टला नेले जात आहे आणि प्रत्येक भारतीयाला परत आणले जाईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आम्हाला सुरक्षित मार्गाची गरज पडणार आहे. युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्व पर्याय वापरणार आहे, आणि युक्रेनच्या पूर्व भागातही एक टीम पाठवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Municipal Election: पालिका निवडणुकांचा पेच हायकोर्टात! राज्य सरकारला द्यावा लागणार जाब; निवडणूक न घेता प्रशासक का नेमले? गोवा खंडपीठाचा रोखठोक सवाल

Horoscope 6 May 2026: बुधवारचा दिवस 4 राशींसाठी 'गोल्डन डे'! गुंतवणुकीतून मिळणार बंपर परतावा, नशिबाची लाभणार साथ; आर्थिक लाभासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

SCROLL FOR NEXT