Virat Kohli Debut Dainik Gomantak
देश

Virat Kohli Debut: रन मशीन, चेस मास्टर... आजच्याच दिवशी क्रिकेट विश्वाला मिळाला 'किंग', 17 वर्षांच्या प्रवासातील विराटचे 3 'सुवर्ण क्षण'

Virat Kohli: १७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो महान फलंदाजांपैकी एक आहे आणि त्याने काही पराक्रम करून भारतीय संघाचे नशीब बदलले आहे.

Sameer Amunekar

बातमीतील ४ महत्त्वाचे मुद्दे

  • विराट कोहलीचे पदार्पण आणि प्रवास

  • कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

  • आयसीसी स्पर्धांंमधील धावा

  • युवा खेळाडूंसाठी ठरलाय आदर्श

विराट कोहली हा भारतीय क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक आहे. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप खास आहे, कारण कोहलीनं १८ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर कोहली केवळ एकदिवसीयच नव्हे तर कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सर्वोत्तम फलंदाज बनला.

कोहलीने त्याच्या १७ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत टीम इंडियाच्या यशात खूप योगदान दिले आहे. चला विराटच्या ३ कारनाम्यांवर एक नजर टाकूया, ज्यांनी टीम इंडियाचे नशीब बदलले.

कसोटीत भारताचे नशीब बदलले

आज भारत कसोटी क्रिकेटमधील सर्वात धोकादायक संघांपैकी एक आहे. याचे संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जाते. जेव्हा विराटने संघाची सूत्रे हाती घेतली तेव्हा परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यानंतर विराटने खेळण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आणि संघाच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले.

याशिवाय, कोहलीने स्वतः फलंदाजीतूनही चांगली कामगिरी केली आणि संघाचे नेतृत्व आघाडीवर केले. विराटच्या नेतृत्वाखाली ५ गोलंदाज खेळवण्याचा ट्रेंड सुरू झाला. तो ६८ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार होता आणि भारतीय संघ फक्त १६ सामन्यांमध्ये पराभूत झाला. त्याचा विजयाचा टक्का ५८.८२ होता.

आयसीसी स्पर्धांमध्ये विराटची शानदार कामगिरी

विराट कोहलीच्या पदार्पणाला १७ वर्षे झाली आहेत आणि तो १४ आयसीसी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान, कोहली हा टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकाव्यतिरिक्त, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपली ताकद दाखवली आहे.

त्याने तिन्ही स्पर्धांमध्ये एकूण ३८३४ धावा केल्या आहेत. विराटने पदार्पणापासून, टीम इंडियाने ४ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि अनेक वेळा अंतिम आणि उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

  • एकदिवसीय विश्वचषक: १,७९५ धावा

  • टी२० विश्वचषक: १,२९२ धावा

  • चॅम्पियन्स ट्रॉफी: ७४७ धावा

२०१२ मध्ये आयपीएलच्या खराब हंगामानंतर विराट कोहलीने त्याच्या फिटनेसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. कोहलीने आरोग्याचे महत्त्व समजून घेतले आणि त्याने आपला आहार आणि प्रशिक्षण बदलले.

तंदुरुस्त झाल्यानंतर विराटने खूप वेगाने धावा काढायला सुरुवात केली आणि त्याने क्षेत्ररक्षणातही वेगवेगळे मानके स्थापित केले. यानंतर, टीम इंडियामध्ये फिटनेसचे महत्त्व वाढले आणि सध्या सर्व खेळाडू स्वतःला चांगल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतात.

प्र.१ : विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण कधी आणि कुठे केले?
उ. : विराट कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

प्र.२ : कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीची मोठी कामगिरी कोणती होती?
उ. : कोहलीने गोलंदाजांवर भर दिला, ५ गोलंदाज खेळवण्याची पद्धत सुरू केली आणि ६८ कसोटींपैकी फक्त १६ हरला. त्याचा विजयाचा टक्का ५८.८२ होता.

प्र.३ : आयसीसी स्पर्धांमध्ये विराट कोहलीचे योगदान किती आहे?
उ. : कोहलीने १४ आयसीसी स्पर्धांमध्ये ३८३४ धावा केल्या आहेत. त्याच्या काळात भारताने ४ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आणि अनेक वेळा अंतिम व उपांत्य फेरीत पोहोचला.

प्र.४ : फिटनेसच्या बाबतीत विराट कोहलीने काय बदल केले?
उ. : २०१२ मध्ये आयपीएल हंगामानंतर त्याने आपला आहार व प्रशिक्षण बदलले, फिटनेसला प्राधान्य दिले आणि टीम इंडियामध्ये तंदुरुस्तीची नवी संस्कृती निर्माण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT