पुष्पा २ फेम अल्लू अर्जुनला संध्या थिएटरप्रकरणी १३ डिसेंबर रोजी हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती आणि अटकेनंतर पोलिसांनी तात्काळ अल्लू अर्जुनला न्यायालयात हजर केले होते आणि अल्लू अर्जुनला एकूण १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, मात्र अल्लू अर्जुनच्या वतीने लढवल्या गेलेल्या कायदेशीर चर्चनंतर अल्लू अर्जुनला तेलंगणा उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अल्लू अर्जुनची जामिनावर सुटका झाल्याने त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.
न्यायालायने जमीन मंजूर केल्यांनतर तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनाने घडलेल्या प्रसंगावर मत व्यक्त केले. "मी कायदा पाळणारा नागरिक आहे आणि मी यंत्रणेला पूर्णपणे मदत करणार आहे." असे तो म्हणाला, एवढंच नाही तर महिलेच्या मृत्यूवरही या प्रसिद्ध अभिनेत्याने हळहळ व्यक्त केली आणि तिच्या कुटुंबाच्या दुःखात मी देखील सहभागी आहे असं म्हणालाय.
पण ही घटना मुद्दामून घडवून आणलेली नाही असेही स्पष्टीकरण देत अल्लूने आम्ही फक्त चित्रपट पाहायला गेलो होतो अशी माहिती दिली. घडलेल्या प्रकाराचे मला दुःख आहे आणि मी माफी मागतो असं म्हणत अल्लू अर्जुनाने पहिल्यांदा त्याची प्रतिक्रिया मांडली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.