How Indians View Gender Roles in Families and Society Dainik Gomantak
देश

भारतीय स्त्रियांच्या निर्णयांवर पारंपारिक नियमांचे वर्चस्व; इंटरनॅशनल रिसर्चचा खुलासा

मुलांची काळजी घेणे ही मुख्यतः महिलांची जबाबदारी आहे.

दैनिक गोमन्तक

तसे तर बहुतेक भारतीय हे सार्वजनिकरित्या मान्य करतात की स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत. तरीही जेव्हा कुटुंबातील स्त्रियांच्या भूमिकेचा विचार केला जातो तेव्हा पारंपारिक नियमांचे वर्चस्व दिसून येते. अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Center) अभ्यासातून एक खास बाब पुढे आली आहे. या रिसर्चमध्ये असे निदर्शनास आले आहे की, '34 टक्के लोकांचा असा समज आहे की, मुलांची काळजी घेणे ही मुख्यतः महिलांची जबाबदारी आहे.' हा अहवाल 29,999 प्रौढांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे.

पारंपारिक भूमिकांना प्राधान्य

वॉशिंग्टन येथील प्यू रिसर्च सेंटरमधून 2 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या 'हाऊ इंडियन्स व्ह्यू जेंडर रोल्स इन फॅमिलीज अँड सोसायटी' (How Indians View Gender Roles in Families and Society) या विषयाचा अभ्यास, नोव्हेंबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान 29,999 भारतीय प्रौढांच्या सर्वेक्षणावर आधारित करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, एकीकडे भारतीय महिलांना राजकीय नेता म्हणून स्वीकारतात, तर त्यांच्यापैकी बहुतांश महिलांच्या कौटुंबिक जीवनात पारंपारिक भूमिकांना प्राधान्य दिले जातात.

पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही पैसा कमवावा

अहवालानुसार, 55% भारतीयांचा असा विश्वास होता की पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान नेतृत्व करणारे राजकीय नेते आहेत. पत्नीने नेहमी आपल्या पतीच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, असे दहापैकी नऊ भारतीयांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे, बहुसंख्य (54%) नागरिक म्हणतात की पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही पैसा कमवावा, तर 43% लोकांच्या मते कमाई ही प्रामुख्याने पुरुषांची जबाबदारी आहे. या पुढे सर्वात धक्कादायक बाबा म्हणजे, 80 टक्के भारतीयांनी या मताशी सहमती दर्शवली की जेव्हा नोकऱ्यांच्या ठिकाणी जागा कमी असतात तेव्हा स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे.

मुलांना प्राधान्य दिले पाहिजे

सर्वेक्षणात बहुतांश भारतीयांनी मुलगा आणि मुलगी या दोघांना महत्त्व दिले. तरीही सुमारे 94% लोकांनी सांगितले की कुटुंबासाठी किंवा कुटूंब पुढे नेण्यासाठी किमान एक मुलगा असणे खूप महत्वाचे आहे. तर मुलींसाठी असे म्हणणाऱ्यांचा आकडा 90% आहे. सुमारे 64 टक्के भारतीयांनी असेही म्हटले आहे की मुलगा आणि मुलीला पालकांकडून वारसा मिळण्याचा समान अधिकार असावा. दहापैकी चार प्रौढांनी म्हातार्‍या आई-वडिलांची काळजी घेण्याची प्राथमिक जबाबदारी मुलांची असायला हवी असे सांगितले, तर केवळ 2% लोकांनी ही जबाबदारी मुलींची असल्याचे सांगितले. अशा विविध विषयांना वाचा फोडणारा हा अहवाल प्यू रिसर्च सेंटरमधून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT