Pahalgam Terror Attack Dainik Gomantak
देश

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना 'अल्टीमेटम', भारत न सोडल्यास 3 लाख रुपये दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा

Pahalgam Terror Attack Ultimatum: भारत सरकारनं जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

भारत सरकारनं जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या हल्ल्यानंतर कडक सुरक्षा उपाय म्हणून, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द करण्यात आले असून, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगीही थांबवण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, एसव्हीईएस व्हिसाखाली भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २७ एप्रिल ही तारीख सार्क व्हिसा धारकांसाठी अंतिम होती, तर वैद्यकीय व्हिसा असलेल्या नागरिकांसाठी २९ एप्रिलची अंतिम तारीख होती.

चार दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिक वाघा अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतले आहेत. परंतु अजूनही अनेक पाकिस्तानी नागरिक भारतात थांबले आहेत. या नागरिकांसाठी भारत सरकारने कठोर उपाययोजना केल्या आहेत. जर या नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडलं नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

कायदेशीर कारवाई अंतर्गत, आरोपींवर खटला दाखल करून तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ३ लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. याशिवाय, व्हिसाची मुदत संपूनही भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

यामुळे, अनेक पाकिस्तानी नागरिकांना भविष्यात भारतातील कायद्याच्या कठोर अंमलबजावणीला सामोरे जावे लागू शकते.त्यानुसार, भारत सरकारच्या आदेशानुसार पाकिस्तानातील नागरिकांना दिलेल्या वेळेत भारत सोडणं अनिवार्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT