Krk And Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

योगींचा पराभव झाला तरच भारतात; केआरकेने घेतली शपथ

चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेचे एक ट्विट चर्चेत आहे. खरं तर, केआरकेने योगी आदित्यनाथ यांना थेट आव्हान.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. तिसरा टप्पा 20 फेब्रुवारीला आहे. दरम्यान, चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेचे एक ट्विट चर्चेत आहे. खरं तर, केआरकेने योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना थेट आव्हान दिले आहे आणि शपथ घेतली आहे की जर योगी पराभूत झाले नाहीत तर ते कधीही भारतात परतणार नाहीत. वास्तविक केआरकेने ट्विट करून लिहिले की, आज मी शपथ घेतो की 10 मार्च 2022 रोजी योगींचा पराभव झाला नाही, तर मी भारतात परत येणार नाही. जय बजरंग बली . केआरकेच्या या ट्विटरवर लोक उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

एका वापरकर्त्याने KRK ची 16 मार्च 2014 रोजीची पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये KRK पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरसोबत दिसत आहे. तेव्हा केआरकेने लिहिले होते की, जर मोदीजी जिंकले तर मी कायमचा भारत सोडत आहे. यावर युजरने लिहिले की, मोदींच्या विजयावर तुम्ही 2015 मध्येच भारत सोडला होता.

केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतो. तो बॉलिवूड (Bollywood) आणि खासकरून सलमान खानला नेहमी टार्गेट करत असतो. त्याचवेळी ते ट्विटरवर विचित्र अंदाज सुध्दा करत राहतात. याआधी केआरकेने गहराईबाबत सुध्दा वादग्रस्त ट्विट केले होते.

विशेष म्हणजे यूपी निवडणुकीचा (Election) निकाल हा 10 मार्चला लागणार आहे. यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान झाले आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात निवडणुका होत आहेत. आता पुढील टप्प्यात 20, 23, 27 फेब्रुवारी, आणि 3 मार्च व 7 मार्च रोजी मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: शिवोली पुलावर भीषण अपघात; कार आणि कदंब बसची समोरासमोर धडक, वाहतुकीचा मोठा खोळंबा

"शून्यावर बाद झालास तरी टेन्शन नको!", गौतम गंभीरच्या 'या' सल्ल्यानं अभिषेक शर्मा चमकला; वेस्ट इंडिजविरुद्ध ठरणार 'एक्स फॅक्टर'

Lairai Jatra: लईराई देवीची जत्रेसाठी 'स्पेशल टास्क फोर्स'ची स्थापना

"..तेव्हाच आपल्याला उमजेल की आपण पैसे खाऊन जगू शकत नाही"! निसर्ग आणि माणूस; एक चिंतन

Konkan Railway: कोकणवासीयांचा 'शिमगा' रेल्वे स्थानकावरच; 7 तास उशिरा धावणाऱ्या 'तेजस एक्सप्रेस'मुळे चाकरमान्यांचे हाल

SCROLL FOR NEXT