West Bengal Chief Minister Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

''अच्छे दिन येणार... आम्ही घाबरत नाही'': मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

आपल्याला देशात (Country) एकता निर्माण करायची आहे.

दैनिक गोमन्तक

कोलकाता: ईदच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याच्या रेड रोडवरुन संबोधित करताना म्हटले की, ''अच्छे दिन येतील... आम्ही घाबरत नाही, आम्हाला कसे लढायचे हे माहित आहे. आज देशात फूट पाडा आणि राज्य करा च्या धोरणाचा अवलंब केला जात आहे. देशाचं राजकारण खूप वेगळ्या दिशेने जात आहे. आपल्याला देशात (Country) एकता निर्माण करायची आहे. आपण जिथे आहोत तिथून चांगला भारत आपल्या सर्वांना हवा आहे.'' (On the occasion of Eid West Bengal Chief Minister Mamata Banerjee has said that good days will come)

दरम्यान, बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) देखील गांधी मैदानावर पोहोचून ईद-उल-फित्रच्या निमित्ताने आयोजित नमाजात सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले की, ''दोन वर्षांपासून कोरोनामुळशे लोक इथे येऊ शकले नाही. परंतु आता ईदच्या निमित्ताने पुन्हा मोठ्या संख्येने लोक इथे आले याचा आनंद आहे. बिहार पुढे जायला हवा, देश पुढे जायला हवा, बंधुभाव हवा.''

तसेच, पूर्व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही नवी दिल्लीतील संसद मार्ग मशिदीत ईदची नमाज अदा केल्यानंतर संपूर्ण देशाला ईद मुबारक म्हटले. ''देशात शांतता नांदावी. सगळेजण एकत्र जमले आनंद आहे. कधी कधी काही लोक वेड्यासारखे वागतात, लोकांची दिशाभूल करतात, नाहीतर देशात सदैव शांतता नांदेल,'' असे अन्सारी यांनी म्हटले.

याशिवाय, बिहार सरकारमधील मंत्री शाहनवाज हुसैन म्हणाले की, 'आम्ही संपूर्ण देशातील जनतेला ईदच्या शुभेच्छा देतो. सर्वांनी बंधुभावाने राहावे, देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. आपल्या देशाने खूर प्रगती करावी.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा विधानसभा निवडणुकीची धग अन् आंदोलनांचा वणवा; सरकारसाठी धोक्याची घंटा? - संपादकीय

Goa Budget 2026-27: गोव्याचा अर्थसंकल्प राहणार 'पीपल सेंट्रिक', मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद; रोजगारावर देणार विशेष भर!

"बाबर तू T20 मधून निवृत्ती घे!" श्रीलंकेविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यापूर्वी माजी कर्णधाराची बोचरी टीका

Shirgao Lairai Jatra: लईराई देवीची जत्रा निर्विघ्न पार पडणार! सुरक्षेसाठी 'स्पेशल टास्क फोर्स'ची स्थापना; सरकारनं कसली कंबर

Goa Weather: राज्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 35 अंशांच्या पार जाणार; वेधशाळेनं दिला 'हा' मोठा इशारा

SCROLL FOR NEXT