Many Pakistani Citizens Are Enthusiastic For Chandrayaan-3 to Be Successful. Dainik Gomantak
देश

Chandrayaan 3: भारत चंद्रावर पोहचला आणि आम्ही..., चांद्रयान-3 चे पाकिस्तानातही कौतुक

Pakistan On Chandrayaan 3: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. शेजारील पाकिस्तानच्या सरकारमध्ये भारताविरुद्ध द्वेषाची भावना आहे, परंतु जनतेने चांद्रयान-3 मोहिमेचे कौतुक केले आहे.

Ashutosh Masgaunde

Many Pakistani Citizens Are Enthusiastic For Chandrayaan-3 to Be Successful: चांद्रयान 3 सह भारताने जगात इतिहास रचण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताचे चांद्रयान-३ बुधवारी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत जावे आणि ते यशस्वी व्हावे यासाठी अनेक पाकिस्तानी नागरिकही उत्साही आहेत.

ते म्हणतात की, पाकिस्तानमध्ये गेल्या 50 वर्षांपासून मौलाना कॅमेऱ्यातील छायाचित्र हराम आहे की हलाल हे अजून ठरवत बसले आहेत. मात्र भारत आज चंद्रावर पोहोचला आहे.

पाकिस्तानी यूट्यूबर शोहेब चौधरीच्या शोमध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारताच्या चांद्रयान-३ बद्दल उघडपणे मत व्यक्त केले.

पाकिस्तानी नागरिक इर्शाद म्हणतात की भारताचे आयटी क्षेत्र संपूर्ण जगात खूप पुढे आहे. अंतराळ तंत्रज्ञानाबाबत बोलायचे झाले तर भारत जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे.

जिथे पाकिस्तान रोटी, कपडा आणि मकान यात गुंतला आहे आणि भारत चंद्रावर जाणार आहे.

याचे एकच कारण आहे की भारतात लोकशाही आहे. भारतात 4 निवडणुका झाल्या तेव्हा पाकिस्तानात फक्त एकच निवडणूक झाली होती.

पाकिस्तानी उलेमा हराम आणि हलालमध्ये अडकला

इर्शाद म्हणाले की, जे पाकिस्तानात भारताच्या चंद्र मोहिमेची खिल्ली उडवत होते, ते आज मोटारसायकलचे सुटे भागही परदेशातून मागवत आहेत. भारताच्या या चांद्रयान मोहिमेबद्दल आपल्याला आनंद झाला पाहिजे.

फक्त मुस्लिम देशांनीच प्रगती करावी असे कुठे लिहिले आहे. आत्तापर्यंत, आमचे मौलाना गेली 50 वर्षे हे ठरवत आहेत की कॅमेरामध्ये काढलेले छायाचित्र हराम आहे की हलाल.

ते म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे लष्कर, दुसऱ्या क्रमांकावर न्यायाधीश आणि तिसऱ्या क्रमांकावर मौलाना आहेत.

कारगिलमध्ये भारताने थेट पाकिस्तानला जोड्याने मारले होते, असे पाकिस्तानी नागरिक इर्शाद म्हणाले. भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यामुळे भारतातील मुस्लिम खूश असल्याचे ते म्हणाले.

भारताच्या ऑटो मोबाईल उद्योगाने जपानला मागे टाकले आहे. भारताची फिल्म इंडस्ट्री किती पुढे गेली आहे.

भारताच्या इस्रोच्या 8 वर्षांपूर्वी पाकिस्तानने अंतराळ मोहीम सुरू केली होती पण ती केवळ कमिशनसाठी आहे. पाकिस्तानी आज देश सोडून जात आहेत.

पाकिस्तानने भारतासोबत व्यापार सुरू करावा

शोहेब चौधरी म्हणाले की, आज 10 पैकी 8 पाकिस्तानींना परदेशात जायचे आहे. पाकिस्तानने भारताकडून शिकले पाहिजे. पाकिस्तानमध्ये लोकशाही असली पाहिजे आणि त्यासाठी भारतासोबत एकत्र काम केले पाहिजे.

पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करावा. पाकिस्तानने भारतासोबत व्यापार सुरू केल्यास भारतापेक्षा जास्त फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT