West Bengal 
देश

परदेशातून मतदानासाठी गावी आला; शौचास गेला अन् गुरांचा तस्कर समजून BSF ने झाडल्या गोळ्या

तरुण रात्री घराशेजारी शौचास गेला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

West Bengal: शौचालयासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. बीएसएफने केलेल्या गोळीबारात तरुणाचा जीव गेला. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमधील मसीबाडी येथील ही घटना असून, हा तरुण रात्री घराशेजारी शौचास गेला होता. याप्रकरणी बीएसएफवर तरुणाला गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप केला जात आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये बीएसएफविरोधात प्रचंड संताप उसळला असून, कुचलीबारी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

गौतम बर्मन असे मृत तरुणाचे नाव असून तो फुलकादावरी गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा तरुण परदेशात मोलमजुरी करून आठवडाभरापूर्वी पंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी गावी परतला होता.

मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तरुणाच्या डोक्यात गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे.

बीएसएफने गोळ्या झाडून मृतदेह काटेरी तारांजवळील भागात फेकून दिला. असे मृताचा भाऊ श्यामल रॉय यांनी म्हटले आहे.

तर, गुरांचा तस्कर असल्याच्या संशयावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा बीएसएफचा दावा आहे. गुरांची तस्करी करण्यासाठी तरुणांना रोखले असता बीएसएफवर हल्ला केला. असे बीएसएफने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT