Dhirendra Krishna Shastri Dainik Gomantak
देश

Dhirendra Krishna Shastri: 'बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना मंत्री बनवा', काँग्रेस नेत्याने...

Madhya Pradesh: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि कुबेरेश्वर धामचे पंडित प्रदीप मिश्रा यांना कॅबिनेट मंत्री करावे.

Manish Jadhav

Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि कुबेरेश्वर धामचे पंडित प्रदीप मिश्रा यांना कॅबिनेट मंत्री करावे, अशी मागणी एका काँग्रेस नेत्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे.

जे काम ते 18 वर्षांत करु शकले नाहीत, ते काम हे दोन महारथी काही मिनिटांत करुन दाखवतील, असा टोला माजी प्रदेश सचिव राकेश सिंह यादव यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

वास्तविक, काँग्रेस (Congress) नेत्याने आपल्या चमत्काराच्या दाव्यांबाबत असा टोला लगावला आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ हे देखील नुकतेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते.

काँग्रेस नेत्याने ट्विटमध्ये म्हटले की, 'कुबेरेश्वर धाम आणि बालाजी धामचे पंडित प्रदीप मिश्रा आणि पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना कॅबिनेट मंत्री बनवावे.

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंडित प्रदीप मिश्रा कुबेरेश्वर धाम आणि पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर धाम यांना कॅबिनेट मंत्री बनवून जनतेची समस्या आणि युवकांची बेरोजगारीतून मुक्तता करावी. जे काम सरकारच्या (Government) मंत्रिमंडळाने 18 वर्षात केले नाही. तो दोन्ही महारथी काही मिनिटांत करतो.'

ते पुढे म्हणाले की, 'मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान 18 वर्षांपासून त्यांच्या मंत्रिमंडळासह मध्य प्रदेशची सेवा करत आहेत. ते 18-18 तास काम करतात, 40-40 मंत्री आहेत. तरीही जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत.

आता दोन महारथी आले आहेत, एक प्रदीप मिश्रा आणि दुसरे धीरेंद्र कृष्ण शास्त्री. ते एक महापुरुष आहेत, ते क्षणार्धात सर्व समस्या सोडवतात. त्यामुळे या दोघांना घटनेतील विशेष तरतुदीनुसार सहा महिन्यांसाठी कॅबिनेट मंत्री करावे, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सहा महिन्यांनी निवडणूक आहे. एकाला समस्या सोडवण्याचे मंत्रालय आणि दुसऱ्याला धार्मिक समस्या सोडवण्याचे मंत्रालय देण्यात यावे.'

ते शेवटी म्हणाले की, 'प्रदीप मिश्रा रुद्राक्षच्या माध्यमातून समस्या सोडवत आहेत. 46 लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात येत आहे. मी सरकारला विनंती करतो की, त्यांना साडेसात कोटी रुद्राक्ष द्यावेत आणि राशन दुकानातून गरिबांमध्ये वाटावेत.

गरीब सुखी होतील, कर्जाची परतफेड होईल, त्यांना नोकरी मिळेल, मुले अभ्यासात तल्लक होतील, द्वेष संपेल, सर्व समस्या संपतील. तर धीरेंद्र शास्त्री पत्रिका लिहून भूत, भविष्य आणि वर्तमान सांगतात. राज्यातील 35 लाख बेरोजगारांना बोलावून त्यांना पत्रिका लिहून त्यांचे भविष्य घडवावे. मध्य प्रदेशातून बेरोजगारी संपवली पाहिजे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach Shacks: 'प्रत्येक वेळी शॅक मालकांवरच कारवाई का'? व्यावसायिकांचा संतप्त सवाल; वस्तुस्थिती तपासण्याची मागणी

Goa Accident: बाईक-टॅंकरचा अपघात, ‘बिट्स’च्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; निष्काळजीपणाबद्दल टँकरचालक अटकेत

Margao: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ अडकला कुठे? आमदार सरदेसाईंचा सवाल; 'प्लॅन’ मध्ये अनेक गुप्त गोष्टी लपल्याचा दावा

March 2026: 'मार्च' संपत का नाहीये? युद्ध, वर्ल्ड कप, ‘धुरंधर 2’ची क्रेझ, एलपीजी टंचाई; पहा या महिन्यात नेमके काय काय घडले?

Chimbel: ‘बजेट’ शिपायाने बनवले काय? चिंबल ग्रामसभेत सरपंचांना संतप्त सवाल; पंचायत मंडळावर ग्रामस्थांची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT