Mahatma Gandhi letter to Hitler Dainik Gomantak
देश

दुसऱ्या महायुद्धामुळे व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी हुकूमशहा हिटलरला लिहली होती दोन पत्रं; काय लिहलं होतं पत्रात? वाचा

Mahatma Gandhi letter to Hitler: गांधीजींच्या मते खरी शांतता मिळवायची असेल तर अहिंसेच्या मार्गावर चालले पाहिजे. या मतबाबत ते ठाम होते. म्हणून त्यांनी हा पत्रप्रपंच केला.

Sameer Panditrao

दुसऱ्या महायुद्धामुळे झालेली हानी आपल्याला माहित आहे. १ सप्टेंबर १९३९ रोजी हे युद्ध सुरु झाले होते. जर्मनीने आधी पोलंडवरती हल्ला केला यानंतर, ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटन आणि फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले, ज्यामुळे युद्धाची अधिकृत सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसत असताना महात्मा गांधी प्रचंड व्यथित झाले होते.

या महायुद्धामुळे होणाऱ्या परिणामांबाबत ते गांभीर्याने विचार करत होते. युद्ध सुरु होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी नाझी हुकूमशहा एडॉल्फ हिटलर यांना थेट पत्र लिहून आवाहन करण्याचा निर्णय घेतला. पण हे पत्र हिट्लरपर्यंत जाऊ दिले गेले नाही. गांधीजींनी आणखी एक पत्र हिटलरच्या नावे लिहिले पण तेंव्हाही वेगळे काही घडले नाही. ही पत्रे हिट्लरपर्यंत पोहोचली नाहीत.

गांधीजींच्या मते खरी शांतता मिळवायची असेल तर अहिंसेच्या मार्गावर चालले पाहिजे. या मताबाबत ते ठाम होते. म्हणून त्यांनी हा पत्रप्रपंच केला. त्यांनी लिहिलेल्या पत्राची मूळ प्रत कुठे उपलब्ध नाही आहे. पण काही अभ्यासकेंद्रात याच्या नकला उपलब्ध आहेत.

पहिल्या पत्राचा सारांश

प्रिय मित्र,

मानवतेच्या हितासाठी मी तुम्हाला पत्र लिहावे, असा आग्रह माझ्या अनेक मित्रांनी मला केला आहे. पण माझ्याकडून आलेले कोणतेही पत्र उद्धटपणाचे ठरेल, अशी भावना असल्यामुळे मी आतापर्यंत त्यांचा हा आग्रह मान्य केलेला नाही. तरीदेखील, मन सांगते की मला आता विचार करून थांबायचे नाही, आणि मला हे आवाहन करायलाच हवे.

आजच्या घडीला, संपूर्ण जगात युद्ध रोखण्याची ताकद जर कुणाकडे असेल तर ती फक्त तुमच्याकडे आहे, हे निर्विवाद आहे. पण तुमच्यासमोर असलेले उद्दिष्ट जरी कितीही श्रेष्ठ वाटत असले तरी, मानवजातीला क्रौर्याच्या गर्तेत ढकलण्याची किंमत तुम्ही मोजावी का?

मी युद्धाच्या मार्गाचा जाणीवपूर्वक त्याग केला आहे आणि त्यातून काही प्रमाणात यशही मिळवले आहे. अशा एका व्यक्तीचे हे नम्र आवाहन तुम्ही ऐकाल का?

हे पत्र लिहिताना माझ्याकडून काही अनुचित झाले असेल, तर त्यासाठी तुमची क्षमा मागतो.

आपला सच्चा मित्र,

एम. के. गांधी

दुसऱ्या पत्राचा सारांश

प्रिय मित्र,

तुम्हाला मित्र म्हणून संबोधणे हे फक्त औपचारिकता नाही. मला कुणी शत्रू नाहीत. मागील ३३ वर्षांपासून माझे जीवनाचे ध्येय आहे मानवतेचा मित्र बनवणे, जात, रंग किंवा धर्म याचा विचार न करता सर्व मानवतेशी मैत्री करणे.

आपल्या शौर्याबद्दल किंवा देशभक्तीबद्दल आपल्याबद्दल शंका नाही. तसेच, तुमचे विरोधक सांगतात तसे तुम्ही मानवतेसाठी भयानक राक्षस आहात, असे मला वाटत नाही.

परंतु तुमची स्वतःची लेखनं, घोषणा आणि तुमच्या मित्र व अनुयायांच्या विधानांमुळे असे स्पष्ट होते की तुमच्या काही कृत्यांमध्ये मानवतेस अपमान होतो, विशेषतः त्या लोकांच्या मते जे सार्वत्रिक मैत्रीत विश्वास ठेवतात.

आमच्यावरील शासकांना आमची जमीन आणि शरीर मिळू शकतात, परंतु आत्मा नाही. सर्व लोक नायकत्व दाखवू शकत नाहीत, हे खरे आहे, परंतु काही लोक आपल्या जीवाची आहुती देऊनही अत्याचारासमोर न झुकता स्वातंत्र्य आणतील.

भारतात अशा लोकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. गेल्या २० वर्षांपासून त्यांची ही तयारी चालू आहे. आम्ही ब्रिटिशांविरुद्ध अहिंसेचा मार्ग निवडला आहे.

तुम्ही तुमच्या लोकांना असा वारसा देत नाहीत ज्याचा त्यांना अभिमान वाटेल. क्रूर कृत्यांची गोष्ट सांगून अभिमान वाटत नाही. म्हणून, मानवतेच्या नावाने, मी तुम्हाला युद्ध थांबवण्याचे आवाहन करतो.

तुम्ही ब्रिटन आणि तुमच्यातील सर्व विवाद आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाला पाठवून काहीही हरवणार नाही. युद्धात यश मिळाले, तरी ते योग्य ठरल्याचे दाखवणार नाही; ते फक्त विनाश शक्ती जास्त असल्याचे दाखवेल. निष्पक्ष न्यायाधिकरणाचा निर्णय मानवतेच्या मर्यादेत योग्य कोण ठरतो हे दाखवेल.

मी मागील काळात ब्रिटनच्या प्रत्येक नागरिकाला अहिंसात्मक प्रतिकार स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी मला मित्र मानले.

पण मी तुमच्याशी अपरिचित आहे. मला तुमच्याकडे तसे आवाहन करण्याचे धैर्य नाही. परंतु हा प्रस्ताव सोपा , व्यावहारिक आणि परिचित आहेत. लाखो युरोपियन लोकांसाठी हे फार महत्त्वाचे आहे की तुम्ही शांततेचा स्वीकार करावा.

मी या पत्राद्वारे मुसोलिनी यांच्याही लक्षात यावे अशी अपेक्षा करतो, ज्यांना मी राऊंड टेबल कॉन्फरन्स दरम्यान इंग्लंडच्या भेटलो होतो.

आपला मित्र,

एम.के. गांधी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT