Rath Yatra Stampede Dainik Gomantak
देश

Jagannath Rath Yatra Stampede: "व्हीआयपी महत्वाचे की भाविकांचे प्राण?" रथयात्रा चेंगराचेंगरी प्रकरणी प्रत्यक्षदर्शींचा गंभीर आरोप Watch Video

Rath Yatra Tragedy: दोन विधी वाहून नेणारे ट्रक गर्दीच्या ठिकाणी घुसल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे

Akshata Chhatre

ओडिशा: ओडिशातील पुरी येथे सुरू असलेल्या जगप्रसिद्ध रथयात्रेदरम्यान रविवार (२९ जून) सकाळी गोंडिचा मंदिरापाशी भीषण चेंगराचेंगरी होऊन तीन भाविकांना प्राण गमवावे लागले, तर ५० हून अधिक जण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा हजारो भाविक धार्मिक विधी पाहण्यासाठी जमले होते. दोन विधी वाहून नेणारे ट्रक गर्दीच्या ठिकाणी घुसल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मृत्यू झालेल्या भाविकांमध्ये प्रेमाकांत मोहंती (८०), बसंती साहू (३६) आणि प्रभाती दास (४२) यांचा समावेश आहे. परिस्थिती नंतर नियंत्रणात आणण्यात आली असली तरी, या घटनेमुळे गर्दीच्या व्यवस्थापनातील प्रशासनाच्या अपयशावर तीव्र टीका होत आहे. प्रत्यक्षदर्शींनी खराब नियोजन आणि व्हीआयपी व्यवस्थेला या गोंधळासाठी जबाबदार धरले आहे.

'व्हीआयपी व्यवस्था आणि अनधिकृत वाहनांमुळे गोंधळ'

या घटनेनंतर राज्य सरकारने तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून, ओडिशाचे पोलीस महासंचालक वाय बी खुराणीया यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रथयात्रेदरम्यान गोंडिचा मंदिरापाशी अशी प्राणघातक घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

स्थानिक रहिवासी स्वाधीन कुमार पांडा यांनी प्रत्यक्ष पाहिलेली परिस्थिती कथन केली. टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी दिलेली माहितीनुसार, "मी काल रात्री २ ते ३ वाजेपर्यंत मंदिरापाशीच होतो, पण व्यवस्थापन अजिबात चांगले नव्हते. व्हीआयपी लोकांसाठी एक नवा मार्ग तयार करण्यात आला होता आणि सामान्य लोकांना लांबून बाहेर पडण्यास सांगितले होते.

लोक प्रवेशद्वारातूनच बाहेर पडू लागले, ज्यामुळे गर्दी वाढली." त्यांनी पुढे सांगितले की, मंदिराशेजारील प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत वाहने घुसली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. "रात्री पोलीस किंवा प्रशासन उपस्थित नव्हते, याला ओडिशा प्रशासनच जबाबदार आहे."

चेंगराचेंगरीत आपल्या पत्नीला गमावलेल्या एका दुःखी व्यक्तीने सांगितले की, अग्निशमन दल, बचाव पथक किंवा रुग्णालय अधिकारी यांनी तात्काळ प्रतिसाद दिला नाही. "ही एक दयनीय घटना आहे, जी शब्दांत व्यक्त करता येत नाही."

गर्दीचा दबाव आणि पूर्वीची घटना

चेंगराचेंगरीची सुरुवात दोन ट्रक धार्मिक साहित्य घेऊन रथांच्या जवळच्या गर्दीच्या भागात घुसल्याने झाली असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शी चिन्मय पात्रा म्हणाले, "अरुंद ठिकाण, मर्यादित पोलिसांची उपस्थिती आणि रथांजवळ विखुरलेल्या ताडमाडाच्या शिड्यांमुळे भाविकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती." भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ रथयात्रा सुरू झाल्यानंतर शनिवारी गोंडिचा मंदिरात पोहोचले होते. स्थानिक रहिवासी देबासिस दास यांनी सांगितले की, गर्दीच्या दबावामुळे भगवान जगन्नाथाचा रथ ओढण्यास आधीच विलंब झाला होता."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT