भारताने इंग्लंडविरुद्ध खेळलेला मँचेस्टर कसोटी सामना यशस्वीरित्या अनिर्णित राखला आणि यजमानांना चालू मालिकेत अजिंक्य आघाडी मिळवण्यापासून रोखले. पण, यासोबतच भारताने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत एक विश्वविक्रमही रचला आहे. टीम इंडियाने तो विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो आजपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मँचेस्टर कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या डावात ३५० धावा करून विश्वविक्रम रचला. भारत एका कसोटी मालिकेत सर्वाधिक ३५०+ धावा करणारा संघ बनला आहे.
टीम इंडियाने या मालिकेत आतापर्यंत ७ वेळा ३५०+ धावा केल्या आहेत आणि याआधी कोणताही संघ कसोटी मालिकेत ७ वेळा असा पराक्रम करू शकलेला नाही. या प्रकरणात, भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला आहे.
भारतापूर्वी, कसोटी मालिकेत सर्वाधिक ३५०+ धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. कांगारू संघाने ६ वेळा ३५०+ धावा करण्याचा चमत्कार केला होता. पण आता भारतीय संघ या बाबतीत पुढे गेला आहे.
ऑस्ट्रेलियाने १९२०-२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत ६ वेळा ३५०+ धावा करण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर, १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुन्हा एकदा ३५०+ धावा केल्या. त्याच वेळी, १९८९ मध्ये, ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध ६ वेळा ३५०+ धावा केल्या. म्हणजेच, १०५ वर्षांपासून सुरू असलेले ऑस्ट्रेलियाचे राज्य संपुष्टात आणून भारताने हा मोठा विक्रम केला.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा ३५०+ धावा करणाऱ्या संघांची नावे
टीम इंडिया, इंग्लंड, २०२५, परदेशात ७
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, १९२०/२१, मायदेशी ६
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, १९४८, परदेशात ६
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, १९८९, परदेशात ६
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.