Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: ''जेव्हा सरकार बदलेल, तेव्हा लोकशाही कमजोर करणाऱ्यांना...''; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi Criticized BJP: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

Rahul Gandhi Criticized BJP: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. भाजप पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीत पणाला लावणार आहे. तर दुसरीकडे, कॉंग्रेससह सर्वच राजकीय पक्ष भाजपचा हा विजयी रथ रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान, कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, ''जेव्हा सरकार बदलेल तेव्हा लोकशाही कमजोर करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल. ही माझी गॅरंटी आहे. अशी कारवाई केली जाईल की पुन्हा हे सर्व करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.'' 15 मार्चचा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये या गोष्टी लिहिल्या आहेत.

एक दिवस सरकार बदलेल- राहुल गांधी

या व्हिडिओत राहुल गांधी म्हणाले की, ''जर सीबीआय आणि ईडीने त्यांचे काम केले असते तर असे झाले नसते. जेव्हा सरकार बदलेल तेव्हा लोकशाही कमजोर करण्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल. याची मी गॅरंटी देतो.''

मनरेगाच्या संदर्भात आक्षेप घेतला

केंद्र सरकारविरोधात राहुल गांधी सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. काल त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) मजुरी 4 रुपयांवरुन 10 रुपये प्रतिदिन वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. राहुल म्हणाले की, मनरेगा कामगारांची मजुरी सरकारने 7 रुपयांवरुन 10 रुपयांपर्यंत वाढली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरी सुधारित करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध राज्यांसाठी चार ते 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.

एका अधिसूचनेनुसार, हरियाणामध्ये या योजनेंतर्गत अकुशल कामगारांसाठी प्रतिदिन 374 रुपये सर्वात जास्त वेतन आहे, तर अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये सर्वात कमी 234 रुपये आहे. राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, “मनरेगा कामगारांचे अभिनंदन! पंतप्रधानांनी तुमच्या वेतनात सात रुपयांची वाढ केली आहे. आता कदाचित तुम्हाला ते विचारतील की, 'एवढ्या मोठ्या रकमेचे तुम्ही काय कराल? आता तुमच्या नावाने 'धन्यवाद मोदी'ची मोहीम सुरु करतील.''

काँग्रेसला तरुणांचे भविष्य घडवायचे आहे- राहुल गांधी

याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. आपल्या पक्षाला तरुणांचे भविष्य घडवायचे आहे आणि भाजपला त्यांची दिशाभूल करायची आहे, असे ते म्हणाले होते. राहुल गांधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हणाले की, “नरेंद्र मोदी जी, तुमच्याकडे रोजगारासाठी काही योजना आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक तरुणाच्या ओठावर आहे. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात भाजपच्या लोकांना विचारले जात आहे - दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन का दिले?'' काँग्रेसने 'युवा न्याय' अंतर्गत रोजगार क्रांतीचे वचन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

'ऑस्ट्रेलियात आम्ही भांडी घासली!' लाहोरमध्ये पोहोचताच पाकिस्तानी कर्णधारानं मांडली व्यथा; पाकड्यांचा निलाजरेपणा पुन्हा जगासमोर उघड

"सर प्लीज गेट उघडा, माझ्या करिअरचा प्रश्न...!" 10 मिनिटांच्या उशिरामुळे हुकली परीक्षा; हताश विद्यार्थिनीनं ट्रेनमधून उडी मारुन संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT