Vaccination Dainik Gomantak
देश

2024 मध्ये भारताला मिळणार नवीन टीबी लस, 6 राज्यांमध्ये ICMR कडून चाचण्या सुरू

भारताला TBची प्रभावी लस मिळेल आणि त्यानंतर भारतात टीबीचा प्रसार रोखण्यात मदत होईल

दैनिक गोमन्तक

प्राणघातक रोग क्षयरोग किंवा क्षयरोगावरील (Tuberculosis) सध्याचा उपचार अद्याप आवश्यक त्या स्वरूपात रूग्णांना मिळत नाही. अशा परिस्थितीत आता भारतातील शास्त्रज्ञांनी टीबीवर प्रभावी लस विकसित करण्याचा दावा केला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून देशात टीबीच्या दोन लसींची चाचणीही सुरू आहे. ही चाचणी 6 राज्यांमध्ये केली जात आहे. असे मानले जाते की जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या तर 2024 पर्यंत भारताला टीबीची प्रभावी लस मिळू शकेल.

वृत्तसंस्था ANI ला दिलेल्या माहितीनुसार डॉ. सुचित कांबळे, शास्त्रज्ञ, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI), पुणे यांच्या म्हणण्यानुसार, भारताला चांगली लस मिळेल आणि त्यानंतर भारतात टीबीचा प्रसार रोखण्यात मदत होईल, असा दावा या रिसर्च टिमने केला आहे.

अशी माहिती देण्यात आली आहे की ICMR देशातील 6 राज्यांमध्ये 18 ठिकाणी फेज 3 दुहेरी अंध प्लेसबो नियंत्रण चाचणी घेत आहे. महाराष्ट्रातही या चाचण्या दोन ठिकाणी केल्या जात आहे. ज्या सहा राज्यांमध्ये या चाचण्या घेतल्या जात आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

ICMR ज्या दोन TB लसींची चाचणी घेत आहे ते VPM1002 आणि Imuvac आहेत. डॉ. कांबळे म्हणतात की, आमच्या साइटवर शेवटची नोंदणी 2024 मध्ये होईल. आम्ही सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतर आम्ही रुग्णांची आकडेवारी जाहीर करू. त्यानंतर विश्लेषण केले जाईल आणि त्याचा अंतिम निकाल मिळेल. या चाचणीत 6 वर्षांवरील लोकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT