Accident Dainik Gomantak
देश

Hazaribagh बस दुर्घटनेवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केला शोक

Hazaribagh Bus Accident: झारखंडमधील हजारीबाग येथील तातीझारिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिवाने नदीच्या पुलाजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Hazaribagh Bus Accident: झारखंडमधील हजारीबाग येथील तातीझारिया पोलीस स्टेशन हद्दीतील सिवाने नदीच्या पुलाजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये 60 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस गिरिडीहहून रांचीला जात होती. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे.

सीएम सोरेन यांनी शोक व्यक्त केला

या अपघातावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, "तातीझरिया येथील पुलावरुन बस पडल्याने काही प्रवाशांचा मृत्यू तर काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. मलाही खूप दुःख झाले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जिल्हा प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.''

मृतांची संख्या वाढू शकते

आत्तापर्यंतच्या अपडेटनुसार, हजारीबाग बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 6 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रिम्समध्ये पाठवण्याची तयारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात की राजस्थान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? पाहा काय सांगतो IPL चा नियम

Monsoon Update: मान्सून उशिरा येणार, पण गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग सुरूच राहणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

SCROLL FOR NEXT