Jitan Ram Manjhi Dainik Gomantak
देश

"मी राम मानत नाही, राम देव नाही"; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात.

दैनिक गोमन्तक

पाटणा : बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. जमुई जिल्ह्यातील सिकंदरामध्ये आंबेडकर जयंतीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या मांझी यांनी लोकांना संबोधित करताना भगवान रामावर प्रश्न उपस्थित केले. (Former Bihar Chief Minister Jeetan Ram Manjhi has made a controversial statement about Lord Rama)

ते म्हणाले की, 'राम हा देव नाही. रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदासांवर माझा विश्वास आहे, परंतु मी रामाला मान नाही.' इथेच न थांबता ते पुढे म्हणाले की, भगवान राम तुलसीदास आणि वाल्मिकींच्या रामायणाचे पात्र होते. सोहळ्याला संबोधित करताना ते म्हणाले की, 'पूजा करुन कोणी मोठा होत नाही.' ते पुढे म्हणाले की, 'अनुसूचित जातीच्या लोकांनी पूजा करणे बंद करावे.'

दरम्यान, ब्राह्मणांवर निशाणा साधत ते म्हणाले की, ''जे ब्राह्मण मांस आणि दारु पितात, ते खोटे बोलतात. अशा ब्राह्मणांपासून दूर राहावे. त्यांची पूजा करु नये. तुम्ही लोक पूजा करणे बंद करा.'' ते पुढे म्हणाले की, ''रामाने शबरीची खोटी बेरी खाल्ली होती. सिकंदरामधील हम पक्षाचे आमदार प्रफुल्ल मांझी यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT