Live In Relationship Dainik Gomantak
देश

लिव्ह इन रिलेशनशिप हा धोकादायक आजार, प्रेमविवाहातही परवानगी हवी; भाजप खासदाराची मागणी

BJP MP Dharambir Singh: लिव्ह-इन रिलेशनशिपला धोकादायक आजार असल्याचे सांगून त्याविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे.

Manish Jadhav

BJP MP Dharambir Singh: भाजप खासदार धरमबीर सिंह यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपला धोकादायक आजार असल्याचे सांगून त्याविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. हरियाणातील भिवानी-महेंद्रगडचे खासदार धरमबीर सिंह म्हणाले की, लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आजाराला समाजातून उखडून टाकण्याची गरज आहे. याविरोधात कायदा करावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. झिरो अवरमध्ये हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी प्रेमविवाहावरही प्रश्न उपस्थित केले. धरमबीर सिंह म्हणाले की, प्रेमविवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लग्नासारख्या बाबतीत वधू-वरांच्या पालकांची संमती आवश्यक असायला हवी.

खासदार सिंह म्हणाले की, 'मला हा गंभीर मुद्दा संसद आणि सरकारसमोर मांडायचा आहे. भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकम साठी ओळखली जाते. आपली सामाजिक बांधणी जगातील इतर अनेक देशांपेक्षा वेगळी आहे. विविधतेतील एकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आपल्या संस्कृतीचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला आहे. ते पुढे म्हणाले की, भारतात अ‍ॅरेंज्ड मॅरेजची परंपरा फार पूर्वीपासून आहे. आजही समाजातील एक मोठा वर्ग कुटुंब आणि नातेवाईकांच्या संमतीनेच लग्नाला महत्त्व देतो. ते पुढे असेही म्हणाले की, लग्नात मुलगा आणि मुलगी यांच्या संमतीशिवाय घरातील सदस्यांशीही सल्लामसलत केली जाते. याशिवाय अनेक बाबीही विचारात घेतल्या जातात.

दरम्यान, लोक कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामाजिक मूल्ये लक्षात घेऊन लग्न करतात. लग्नासारख्या पवित्र बंधनाचे पावित्र्य राखले पाहिजे, असे ते म्हणाले. खासदार धरमबीर म्हणाले की, 'लग्न हे पवित्र नाते मानले जाते, जे 7 पिढ्या टिकते. भारतात घटस्फोटाचे प्रमाण केवळ 1.1 टक्के आहे, तर अमेरिकेत तेच प्रमाण 40 टक्के आहे. असे आढळून आले आहे की, घटस्फोट फार कमी वेळा अ‍ॅरेंज्ड मॅरेजमध्ये होतात. मात्र, अलीकडच्या काळात देशात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे प्रेमविवाहात अधिक नाती तुटतात.

प्रेमविवाहातही पालकांची संमती आवश्यक असते, अन्यथा कुटुंब उद्ध्वस्त होते

ते पुढे म्हणाले की, माझी सूचना आहे की प्रेमविवाहात पालकांची मान्यता अनिवार्य करावी. याचे कारण असे की, देशाच्या मोठ्या भागात एकोप्याने विवाह होत नाहीत. प्रेमविवाहावरुन गावात अनेक वाद होतात. अशा भांडणात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. अशा परिस्थितीत दोन्ही घरच्यांच्या मान्यतेने लग्न होणे आवश्यक आहे. ते पुढे असेही म्हणाले की, आता आणखी एक नवीन आजार उद्भवला आहे, ज्याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हटले जात आहे. या अंतर्गत दोन व्यक्ती लग्नाशिवाय एकत्र राहू शकतात.

दरम्यान, त्यांनी यावेळी बोलताना श्रद्धा हत्याकांडाचाही उल्लेख केला. धर्मबीर सिंह म्हणाले की, 'पाश्‍चिमात्य देशांमध्ये असे संबंध सामान्य आहेत, परंतु आपल्या समाजातही हे दुष्प्रवृत्ती वेगाने पसरत आहे. त्याचे परिणाम अत्यंत घातक आहेत. नुकतेच श्रद्धा आणि आफताब पूनावालाचे प्रकरणही समोर आले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. ते पुढे म्हणाले की, आता अशी प्रकरणे रोज समोर येत आहेत. यामुळे आपली संस्कृती नष्ट होत असून समाजात द्वेष निर्माण होत असल्याचे खासदार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT