Arvind Kejriwal DainikGomantak
देश

''काश्मिरी पंडितांचे दोनदा स्थलांतर हे भाजपच्या राजवटीतच''

गुजरात येथील मेहसाणा येथे आम आदमी पार्टीने काढली तिरंगा यात्रा

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात येथील मेहसाणा येथे तिरंगा यात्रा काढली. यावेळी त्यांनी गुजरातचे राजकारण आणि तेथील जनतेला विकासाभिमूख बदल हवा आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी आम आदमी पार्टीला निवडणून देणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कारण जिथे जाल तिथे भाजपवाले गुंडगिरी करतात गुजरातमधील लोक घाबरल्याने त्यांना बदल हवा आहे. असे ते म्हणाले. केजरीवाल यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले. अहमदाबादमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. (Arvind Kejriwal launched Tiranga Yatra at Mehsana in Gujarat )

पुढे बोलताना ते म्हणाले की, मेहसाणामध्ये आम आदमी पार्टीलाने तिरंगा यात्रा काढली आहे. 182 विधानसभांमध्ये गेल्या 20 दिवसांपासून परिवर्तन यात्राही सुरू आहे. तसेच भाजपवाले भाजपच्या विरोधात काहीही बोलले तर मारायला सुरुवात करतात. यावर एकमेव औषध म्हणजे आम आदमी पार्टीला विजयी करणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

याशिवाय काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांची ज्या प्रकारे हत्या केली जात आहे ते योग्य नाही. काश्मिरी पंडितांनी गेल्या 30 वर्षात दोनदा स्थलांतर केले असून हे काम भाजपच्या राजवटीतच झाले आहे. ते म्हणाले की, मी सरकारला आवाहन करतो की, जी काही आवश्यक पावले उचलली जातील आणि काश्मिरी पंडितांना सुरक्षा पुरवावी लागेल.

हिंमत असेल तर तोंडातून माझे नाव घेऊन दाखवा

केजरीवाल म्हणाले की, गुजरातचे खरे मुख्यमंत्री सीआर पाटील आहेत. ते सरकार चालवतात पण माझे नाव घेण्याचे धाडस त्यांच्यात नाही. सीआर म्हणतो की दिल्लीतून ठग येतो पण तो माझे नाव घेत नाही. हिंमत असेल तर तोंडातून माझे नाव घेऊन सीआर पाटील दाखवा, असे ते म्हणाले.

तिरंगा यात्रेदरम्यान शहिदांचे नाव घेऊन त्यांनी भाजपवर निशाणा साधला. दिल्लीतील जवान किंवा पोलीस अधिकारी शहीद झाल्यावर आम आदमी पक्षाचे सरकार त्याला एक कोटी रुपये देते, पण गुजरातमध्ये शहीद झाला असेल तर त्याला फक्त एक लाख रुपये दिले जातात, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT