PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी सरकारने केली मोठी घोषणा, खात्यात येणार एवढी मोठी रक्कम; लवकरच...!

PM Kisan Yojana: मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे, आता शेतकरी बांधवांच्या खात्यात 10 हजार नव्हे तर 12 हजार रुपये येणार आहेत.

Manish Jadhav

PM Kisan Yojana: मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे, आता शेतकरी बांधवांच्या खात्यात 10 हजार नव्हे तर 12 हजार रुपये येणार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजगड जिल्ह्यात किसान-कल्याण महाकुंभला संबोधित करताना ही घोषणा केली.

ते म्हणाले की, आता मुख्यमंत्री किसान-कल्याण योजनेंतर्गत राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देणार आहे.

आता, शिवराज सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांना (Farmer) दरवर्षी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असून, त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे.

आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहेत

मुख्यमंत्री किसान-कल्याण योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना आतापर्यंत 4 हजार रुपये दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर त्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. अशाप्रकारे पीएम किसानची वार्षिक रक्कम 6 रुपये आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 12 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

6 हजार 423 कोटी रुपये वितरित केले

त्याचवेळी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि सीएम चौहान यांनी एका क्लिकवर मुख्यमंत्री शेतकरी व्याज माफी योजना-2023 मध्ये 11 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार 123 कोटी, 44 लाखांच्या खात्यात 2 हजार 900 कोटी प्रधानमंत्री फसल विमा योजनेत 49 हजार शेतकरी, मुख्यमंत्री किसान-कल्याण योजनेत 70 लाख 61 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 हजार 400 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 6 हजार 423 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी सिंचन क्षमता वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे

सीएम चौहान म्हणाले की, "आधीच्या सरकारने शेतकऱ्यांवर लादलेला व्याजाचा बोजा आता शेतकऱ्यांच्या डोक्यावरुन उतरवला जात आहे. शेतकऱ्यांकडून मूग खरेदी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले की, सिंचन क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची स्थिती सुधारली आहे. एकेकाळी 7.5 लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेली राज्याची सिंचन क्षमता आता 45 लाख हेक्टर झाली असून ती 65 लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

वीज निर्मितीत स्वयंपूर्ण झालो : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले की, 'पूर्वी राज्यात तासनतास वीज बंद असायची. आता राज्य वीज निर्मितीत स्वयंपूर्ण झाले आहे. पूर्वीच्या सरकारने सिंचन आणि रस्त्यांचीही व्यवस्था केली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाली.'

सीएम चौहान पुढे असेही म्हणाले की, ''सुखलिया प्रकल्प बाधित शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईत वाढ करण्याचाही निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

SCROLL FOR NEXT