PMSBY Dainik Gomantak
अर्थविश्व

PMSBY: केवळ 20 रूपयात 2 लाखांचा विमा; जाणून घ्या या सरकारी योजनेची खास वैशिष्ट्ये

अपघातात अंशतः अपंग झाल्यास मिळतात एक लाख रूपये

गोमंतक ऑनलाईन टीम

PMSBY: केंद्र आणि राज्य सरकारे अनेकदा गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना आणतात. याद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली जात असते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देखील अशीच आहे.

हा अपघात संरक्षण विमा योजना आहे ज्यामध्ये तुम्ही वार्षिक फक्त 20 रुपये गुंतवून 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळवू शकता.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे?

ही योजना सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. देशात एक मोठा वर्ग आहे जो जास्त प्रीमियममुळे विमा योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत सरकारच्या या विशेष योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब वर्गापर्यंत विम्याची सुविधा पोहोचली आहे. या योजनेत फक्त 20 रुपये खर्च करून तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विम्याचा लाभ मिळू शकतो.

लाभ कोण घेऊ शकतो

PMSBY ही एक सरकारी विमा योजना आहे जी 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणीही घेऊ शकते. या विमा योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते. दुसरीकडे, अपघातात व्यक्ती अंशतः अपंग झाल्यास, अशा स्थितीत विमाधारकाला 1 लाख रुपयांची रक्कम मिळेल.

प्रीमियम कसा जमा करायचा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेला भेट देऊन PMSBY साठी अर्ज करू शकता. या योजनेतील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ऑटो डेबिट मोडद्वारे दरवर्षी 1 जून रोजी तुमच्या खात्यातून रक्कम आपोआप कापली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

SCROLL FOR NEXT