ठाकरे सरकारची कोकण वासीयांसाठी मोठी घोषणा!

गणेशत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासी पुणे, मुंबईतून (Mumbai) खास कोकणामध्ये जातात.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोनाचा सावट (Covid 19) असताना दुसरीकडे गणेशत्सव सुरु होण्यासाठी काही दिवसच राहिले आहेत. राज्यात दरवर्षी गणेशत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशत्सव साजरा करण्यासाठी कोकणवासी पुणे, मुंबईतून (Mumbai) खास कोकणामध्ये जातात. यंदा मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात गणेशत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. याच पाश्वभूमीवर ठाकरे सरकारची (Thackeray Government) महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Uddhav Thackeray
OBC Reservation ठाकरे सरकार झोपेचं सोंग घेतंय: राणे

दरम्यान, गणेशत्सवाला अवघे पाचच दिवस बाकी राहिले आहेत. यंदाही गणेशत्सवसाठी गोवा-मुंबई तसेच पुण्याहून कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यासंबंधीची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर टोलमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर पोलिस, वाहतूक पोलिस, खड्डे दुरुस्ती अशा आणि इतर अनेक उपाययोजना करण्यासाठी आज राज्य सरकारने बैठक घेतली आहे.

Uddhav Thackeray
ठाकरे सरकार दारुडे; माजी मंत्र्यांची जहाल टीका

शिवाय, कोकण मार्गावरील टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी नागरिकांना गाडीची माहिती दिल्यानंतर स्टिकरही देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या अवघ्या दोन दिवसाआगोदर आणि विसर्जनाच्या 2 सेवा कार्यरत असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com