मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला केली अटक

कोविड-19 (Covid-19) च्या संकटाच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन कराव्यात.
Hindustani Bhau
Hindustani BhauDainik Gomantak
Published on
Updated on

'हिंदुस्थानी भाऊ'वर मोठी कारवाई करत मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला अटक केली असून अटकेपूर्वी हिंदुस्थानी भाऊंनी (Hindustani Bhau) जामिनासाठी वकिलांचा सल्ला घेतला . या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिले होते. सोमवारी मुंबईतील (Mumbai) धारावीमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. कोविड-19 (Covid-19) च्या संकटाच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. हिंदुस्थानी भाऊचे खरे नाव विकास पाठक आहे. (Maharashtra Latest News Update)

महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात सोमवारी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. या विद्यार्थ्यांनी मुंबईतील धारावी येथील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचा घेराव केला. शेकडोच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

Hindustani Bhau
बोटीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींचे धाडस बघून मुंबई हायकोर्ट निशब्द

विद्यार्थी का नाराज आहेत?

रविवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षा वेळेवर होणार असून ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगितले होते. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. परीक्षेची वेळ वाढवून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ज्या काही मागण्या आहेत, त्यावर चर्चा होऊ शकते, आंदोलनाची गरज काय? माहिती न देता आंदोलन करणे चुकीचे असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. 1 फेब्रुवारी म्हणजेच आज महत्त्वाची बैठक बोलावून या प्रश्नावर विचार करून समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे

वर्षा गायकवाड आज या विषयावर चर्चा करणार आहेत

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर वर्षा गायकवाड एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या, 'विद्यार्थ्यांच्या दोन वेगवेगळ्या मागण्या पुढे येत आहेत. काही मुलांची परीक्षा रद्द करावी, तर काही परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे परीक्षा देताना अनेक अडथळे येतात. 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 30 लाखांहून अधिक आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी परीक्षा घेतली जाते.

विद्यार्थी आदिवासी भागात आणि अगदी दुर्गम भागात राहतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे परिस्थिती खूप बदलली आहे. विद्यार्थ्यांवरही कोरोना आणि परीक्षांचा दुहेरी भार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागू नये, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला परीक्षा लवकर घ्यायची आहे जेणेकरून पुढील वर्गात प्रवेश घेण्यास विलंब होऊ नये. त्यांना रस्त्यावर उतरण्यासाठी भडकवणे योग्य नाही. काही अडचण आल्यास आम्ही चर्चेला तयार आहोत. पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे आपल्या मागण्या घेऊन पुढे येतील त्यांच्याशी उद्या चर्चा करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com