Weather Impact: महाराष्ट्रातील 27 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

येत्या 5 दिवसांत नागपुरकरांना उष्णतेची झळ, IMD चा इशारा
Heat is increasing Maharashtra
Heat is increasing MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

Nagpur Weather Update: महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असून, त्यामुळे हवामान खात्याकडून सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. नागपूर आयएमडीचे उपसंचालक एमएल साहू म्हणाले, "पुढील 5 दिवस उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम भागात तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे." चेतावणी जारी केली आहे. (A 27-year-old farmer from Maharashtra died of heatstroke)

Heat is increasing Maharashtra
'हिंदू सणांवर बंधनं घालू नका तुमचे निर्बंध चुलीत घाला: राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

उष्णतेमुळे एकाचा मृत्यू झाला

महाराष्ट्रातील (Maharashtra) जळगाव जिल्ह्यात एका 27 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. राज्यातील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जळगाव जिल्हा कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील चालू उन्हाळी हंगामातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अहवालानुसार, येथून सुमारे 400 किमी अंतरावर असलेल्या जळगाव जिल्ह्यात मंगळवारी 41.8 अंश कमाल तापमानाची नोंद झाली.

येत्या काही दिवसांत नागपूरशिवाय (Nagpur) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांसह काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र

IMD च्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम, मध्य (विदर्भसह) आणि पश्चिम भारतात (कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह) पुढील 4-5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. 30 मार्चसाठी, 36 पैकी 11 जिल्ह्यांतील विविध भागात उष्णतेची लाट दर्शविणारा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com