Yuvraj Singh: 'अखेर 23 वर्षांपूर्वीची परतफेड झालीच...', भारताने श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर युवीचं ट्वीट चर्चेत

Asia Cup 2023: भारतीय संघाने श्रीलंकेला फायनलमध्ये पराभूत करत आशिया चषक जिंकल्यानंतर युवराज सिंगने केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.
Yuvraj Singh | Team India
Yuvraj Singh | Team IndiaDainik Gomantak

Yuvraj Singh Social Media Post after Team India Won Asia Cup 2023 :

भारत आणि श्रीलंका संघात रविवारी (17 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्सने विजय मिळवत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा आशिया चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

यानंतर भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये युवराज सिंगचाही समावेश आहे. दरम्यान, युवराजने पोस्ट शेअर करताना 23 वर्षांपूर्वीच्या एका सामन्याचीही आठवण करून देत पाठीवरचं ओझं उतरल्याचं म्हटलं आहे.

Yuvraj Singh | Team India
World Cup 2023 पूर्वी भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह संघांना सतावतेय दुखापतींची चिंता, डझनभर खेळाडू जखमी

त्याने ट्वीटमध्ये लिहिले की 'अखेर आमच्या पाठीवरचे ओझे उतरले. 23 वर्षांपूर्वी भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 54 धावांवर शारजाहमध्ये सर्वबाद झाला होता. आशिया चषकातील वर्चस्वपूर्ण कामगिरीबद्दल खेळाडूंचे अभिनंदन. आशा आहे की हीच लय वर्ल्डकपमध्ये कायम राहिल.'

23 वर्षांपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना शारजाह येथे झाला होता. त्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 299 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाला 26.3 षटकात 54 धावांवर सर्वबाद केले होते. त्यावेळी युवराज सिंग देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये होता. तो 3 धावांवर बाद झाला होता.

Yuvraj Singh | Team India
IND vs SL Final: अवघ्या सव्वा दोन तासांत श्रीलंकेचा 'खेळ' खल्लास अन् सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा सुळसुळाट

त्यानंतर आता रविवारी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली होती, पण श्रीलंकेचा डाव 15.2 षटकातच 50 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस (17) आणि दुशन हेमंता (13) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. यातील 4 विकेट्स त्याने चौथ्याच षटकात घेतल्या होत्या. तसेच हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली.

त्यानंतर भारताने 51 धावांचे आव्हान अवघ्या 6.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. त्याचमुळे या दोन सामन्यांची तुलना करत युवराजने परतफेड झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, भारताने एकूण आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारताने 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 साली आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com