IND vs ENG: राजकोटमध्ये चालणार अश्विनच्या फिरकीची जादू? कुंबळेच्या रेकॉर्डशी बरोबरी करण्याची संधी

Ravichandran Ashwin: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.
Ravindra Jadeja - R Ashwin
Ravindra Jadeja - R AshwinDainik Gomantak

Ravichandran Ashwin: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे.

राजकोट कसोटी सामन्यात स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन महान लेगस्पिनर अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी करु शकतो. असा एक विक्रम आहे जो आतापर्यंत फक्त अनिल कुंबळेच भारतासाठी आपले नाव नोंदवू शकला आहे. मात्र, अनिल कुंबळेच्या या खास क्लबमध्ये सहभागी होण्याची रविचंद्रन अश्विनला संधी आहे.

अश्विनला कुंबळेची बरोबरी करण्याची संधी आहे

दरम्यान, रविचंद्रन अश्विनने भारताकडून 97 कसोटी सामने खेळताना एकूण 34 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळेने भारतासाठी 132 कसोटी सामने खेळले आणि एकूण 35 वेळा 5 बळी घेतले. जर रविचंद्रन अश्विनने 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आणखी 5 विकेट्स घेतल्या तर तो अनिल कुंबळेच्या या महान विक्रमाची बरोबरी करेल.

रविचंद्रन अश्विन हा भारताचा गोलंदाज बनेल ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 35 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत आणि या बाबतीत तो अनिल कुंबळेची बरोबरी करेल. रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 499 विकेट घेतल्या आहेत.

Ravindra Jadeja - R Ashwin
IND vs ENG: विराट कोहली संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर, एका नव्या चेहऱ्याला मिळणार संधी

भारताकडून सर्वाधिक 5 बळी घेणारे गोलंदाज (कसोटी)

1. अनिल कुंबळे (भारत) - 35 वेळा 5 बळी घेतले

2. रविचंद्रन अश्विन (भारत) - 34 वेळा 5 बळी घेतले.

3. हरभजन सिंग (भारत) - 25 वेळा 5 बळी घेतले

4. कपिल देव (भारत) - 23 वेळा 5 बळी घेतले

5. भागवत चंद्रशेखर (भारत) - 16 वेळा 5 बळी घेतले

अश्विन 500 कसोटी बळींच्या जादुई आकड्यापासून एक पाऊल दूर

रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 97 कसोटी सामन्यांमध्ये 499 बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विनने आणखी एक विकेट घेताच कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचणार आहे. आणखी एका विकेटसह रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा जादुई आकडा गाठेल.

रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे. आतापर्यंत केवळ महान लेगस्पिनर अनिल कुंबळेलाच भारतासाठी हा मोठा टप्पा गाठता आला आहे. भारतासाठी, आतापर्यंत केवळ अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळेला 500 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेण्यात यश आले आहे. अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत.

Ravindra Jadeja - R Ashwin
IND vs ENG: पराभूत होऊनही इंग्लंडने केला 'हा' मोठा रेकॉर्ड; भारताविरुद्धच्या चौथ्या डावात पहिल्यांदाच...

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 800 कसोटी विकेट्स

2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708 कसोटी विकेट्स

3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 695 कसोटी विकेट्स

4. अनिल कुंबळे (भारत) – 619 कसोटी विकेट्स

5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) - 604 कसोटी विकेट्स

6. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 कसोटी विकेट्स

7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 519 कसोटी विकेट्स

8. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) – 517 कसोटी विकेट्स

9. रविचंद्रन अश्विन (भारत) – 499 कसोटी विकेट्स

10. डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) – 439 कसोटी विकेट्स

Ravindra Jadeja - R Ashwin
IND vs ENG, Test: तिसऱ्या दिवसाखेर सामन्याला रोमांचक वळण! विजयासाठी इंग्लंडला 332 धावांची, तर भारताला 9 विकेट्सची गरज

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज

1. अनिल कुंबळे – 619 कसोटी विकेट्स

2. रविचंद्रन अश्विन – 499 कसोटी विकेट्स

3. कपिल देव - 434 कसोटी विकेट्स

4. हरभजन सिंग – 417 कसोटी विकेट्स

5. इशांत शर्मा/झहीर खान – 311 कसोटी विकेट्स

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com