IND vs ENG 5th Test: 100व्या कसोटीत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी; कपिल देवला सोडले मागे

IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे.
R Ashwin
R Ashwin Dainik Gomantak

IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ टीम इंडियाच्या नावावर होता. नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. 100 वा कसोटी सामना खेळत असलेल्या आर अश्विनने अप्रतिम गोलंदाजी केली.

आर अश्विनची 100 व्या कसोटी सामन्यातील कामगिरी

दरम्यान, आर अश्विन भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 14 वा खेळाडू ठरला. या विशेष सामन्याच्या पहिल्या डावात त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आर अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात 11.4 षटके टाकली आणि 51 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यादरम्यान आर अश्विनने बेन फॉक्स, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

R Ashwin
IND vs ENG 5th Test: शानदार 5 विकेट्स! इंग्लिश संघावर एकटा कुलदीप 'भारी'; कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकांसह केला मोठा रेकॉर्ड

या विशेष यादीत कपिल देव यांना मागे सोडले

आर अश्विनने या सामन्याच्या पहिल्या डावात एक खास विक्रमही आपल्या नावावर केला. 100 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, कपिल देव या यादीत आघाडीवर होते. कपिल देव यांनी आपल्या 100 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 69 धावांत 4 बळी घेतले होते.

R Ashwin
IND vs ENG 5th Test: जॉनी बेअरस्टोचा 100व्या कसोटी सामन्यात मोठा पराक्रम; धरमशाला कसोटी ठरली खास

कुलदीप यादवने 5 बळी घेतले

दुसरीकडे, या सामन्यातील पहिल्या डावात कुलदीप यादव सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. कुलदीप यादवने 15 षटकात 72 धावा देत 5 बळी घेतले. कुलदीप यादवने जॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या स्टार फलंदाजांना आपले बळी बनवले. कसोटी सामन्याच्या एका डावात 5 बळी घेण्याची त्याची कारकिर्दीतील ही चौथी वेळ आहे.

कर्णधार म्हणून रोहित शर्माचा विक्रम

रोहित शर्माने भारतीय कर्णधार म्हणून 114 सामने खेळले आहेत. जिथे त्याने 84 विजय आणि 26 पराभवांची नोंद केली आहे. दोन अनिर्णित आणि एका निकाल न लागलेल्या सामन्यातही त्याने संघाचे नेतृत्व केले. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, रोहित शर्माने कर्णधार म्हणून 15 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. या सामन्यांमध्ये नऊ विजय आणि चार पराभव पत्करले आहेत. रोहितची विजयाची टक्केवारी 69.23 आहे. रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला असून जून महिन्यात तो टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com