"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

India vs Afghanistan 2nd T20: अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मधील एका निर्णयावरून चर्चा रंगली आहे.
India vs Afghanistan 2nd T20
India vs Afghanistan 2nd T20Dainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मधील एका निर्णयावरून चर्चा रंगली आहे. पहिल्या टी-20 सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले नव्हते. या निर्णयावर भारताचे माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैभवला अचानक संघाबाहेर ठेवणे योग्य नसल्याचे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे वैभवला खेळताना न पाहिल्याने आपली पत्नीही नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले.

वैभवला प्लेइंग-11 मधून वगळल्याने प्रश्न

वैभव सूर्यवंशीने यापूर्वीच्या सामन्यात प्रभावी कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे त्यानंतरच्या सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेक चाहत्यांना होती. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये वैभवला बाकावर बसवण्यात आले. त्याच्या जागी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली.

श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवरील चर्चेत याच निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. चांगली कामगिरी केल्यानंतर लगेचच खेळाडूला बाहेर बसवणे त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘वैभव खेळत नसल्याचे पाहून पत्नीही ओरडली’

पहिल्या टी-20 मध्ये वैभव सूर्यवंशी खेळणार नसल्याचे समजल्यानंतर आपण सामना पाहण्याऐवजी चित्रपट पाहायला लागलो, असे श्रीकांत यांनी सांगितले. मात्र, वैभवला अंतिम अकरामध्ये स्थान नसल्याचे पाहून त्यांच्या पत्नीचीही प्रतिक्रिया तीव्र होती.

श्रीकांत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी वैभवला बाहेर ठेवल्याचे पाहून नाराज झाली आणि ‘मागच्या सामन्यात सामनावीर ठरलेला खेळाडू आज का खेळत नाही?’ असा सवाल केला. श्रीकांत यांनीही वैभवसोबत योग्य पद्धतीने व्यवहार होत नसल्याचे मत व्यक्त केले.

India vs Afghanistan 2nd T20
Goa Politics: गिरीश चोडणकरांच्या पोस्टवर उत्तराखंड पोलिसांचा डोळा! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा; पोस्ट हटविण्याची 'एक्स'कडे मागणी

‘पुढच्या सामन्यात धावा नाही केल्या तर?’

श्रीकांत यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केला. वैभवला आता पुढील सामन्यात संधी दिली आणि त्याच्याकडून अपेक्षित धावा झाल्या नाहीत, तर त्याला पुन्हा संघाबाहेर केले जाईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

युवा खेळाडूला सातत्याने संधी देणे आणि त्याच्यावर विश्वास दाखवणे महत्त्वाचे असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. विशेषतः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात खेळाडूला संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा मिळणे त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

ओपनिंग जोडी वारंवार बदलू नका

भारतीय संघाने सलामीची जोडी वारंवार बदलण्याची पद्धत टाळावी, असा सल्लाही श्रीकांत यांनी दिला. त्यांच्या मते, कधी संजू सॅमसनला तर कधी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यापेक्षा संघाने एका संयोजनावर विश्वास ठेवून त्याला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.

India vs Afghanistan 2nd T20
Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

संजू आणि वैभव दोघांसाठी सातत्य महत्त्वाचे

श्रीकांत यांनी संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी या दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत भारतीय संघाकडून सातत्याचा अभाव असल्याचे म्हटले. एका खेळाडूला दोन सामने खेळवायचे आणि त्यानंतर दुसऱ्याला संधी द्यायची, असे वारंवार केल्याने दोघांवरही दबाव निर्माण होऊ शकतो.

त्यांच्या मते, भारतीय संघाने एकतर संजू सॅमसनला सलामीला सातत्याने संधी देऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा किंवा वैभववर विश्वास ठेवून त्याला सलग सामने खेळवावेत. वारंवार होणारे बदल खेळाडूंसाठी तसेच संघाच्या संयोजनासाठीही फायदेशीर ठरणार नाहीत.

श्रीकांत यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

वैभव सूर्यवंशीला पहिल्या टी-20 मध्ये संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये आधीच चर्चा सुरू होती. त्यात आता श्रीकांत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या निर्णयावर आणखी प्रश्न उपस्थित झाले आहेत. युवा खेळाडूला किती सामने सातत्याने संधी दिली जाते आणि त्याच्यावर संघ व्यवस्थापन किती विश्वास दाखवते, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com