
कुंकळ्ळी: ट्रेकिंगनंतर मुंबईतील पर्यटकाचा बटरफ्लाय बीचवर मृत्यू झाल्याची घटना रविवारी (०८ डिसेंबर) उघडकीस आली. ट्रेकिंग करुन माघारी आल्यानंतर तरुणाला अत्यवस्थ वाटू लागले दरम्यान, थोड्याच वेळात त्याला उलटीसह विविध त्रास होऊ लागला. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. तरुण मित्रांसोबत गोव्यात पर्यटनासाठी आला असता ही घटना घडली.
मिराल गाला (वय. २३, रा. मुंबई) असे या दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिराल पाच मित्रांसोबत ०५ डिसेंबर रोजी गोव्यात पर्यटनासाठी आला होता. त्यांनी वार्का येथे मुक्काम केला होता.
०८ डिसेंबर रोजी त्यांनी बटरफ्लाय बीच येथे ट्रेकिंगला जाण्याचा निर्णय घेतला. ट्रेकिंगवरुन माघारी आल्यानंतर मिरालला त्रास होऊ लागला. अत्यवस्थ वाटत असल्याने त्याने पाणी घेतले. पण, नंतर त्याला उलट्या झाल्या व तो खाली कोसळला. सोबतच्या मित्रांनी त्याला तात्काळ बाळ्ळी येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, येथील डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, मिराल गाला याच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने रक्तप्रवाहास अढथळा निर्माण झाला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे. कुंकळ्ळी पोलिसांत याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.