

म्हापसा: देशभरात पुरुष कर्मचाऱ्यांमधील आत्महत्या व मानसिक तणावाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ, वाढीव तास काम करण्याचा दबाव आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक कर्मचारी टोकाचे पाऊल उचलतात.
स्वेच्छानिवृत्तीसारखे पर्याय कर्मचाऱ्यांना परिस्थिती असह्य झाल्यानंतरच वापरावे लागतात, असे मत उत्तर गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर यांनी व्यक्त केले. कोलवाळ कारागृहात नवनवे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. कारागृहातून चालणारे ड्रग्ज नेटवर्क, कैद्यांमधील मारामारी आणि हत्येपर्यंत पोहोचलेले वाद यामुळे हे कारागृह सुधारगृह राहिले नसून, गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे.
पोलीस आणि गुंड यांच्यातील कथित अभद्र युतीमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव गुदमरत आहे. केवळ घटना घडल्यानंतर चौकशी समिती स्थापन करणे ही आता एक ‘औपचारिकता’ बनली आहे. अशा समित्यांचे अहवाल बहुतांश वेळा कागदावरच राहतात किंवा सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार गुंडाळले जातात.
त्यामुळे केवळ तात्पुरत्या चौकशीऐवजी प्रत्येक शासकीय संस्था आणि कारागृहात स्वतंत्र ‘मानसिक आरोग्य व मार्गदर्शन कक्ष’ तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळविरोधी समिती स्थापन करण्याची गरज आहे. जिथे कर्मचारी कोणतीही भीती न बाळगता आणि आपले नाव गुप्त ठेवून तक्रारी मांडू शकतील, अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.