Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडत आहे
Raj Thackeray On Goa-Mumbai expressway
Raj Thackeray On Goa-Mumbai expresswayDainik Gomantak

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. त्याशिवाय त्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. आपल्या भाषणादरम्यान राज यांनी पंतप्रधान मोदींकडे सहा मागण्या केल्या. यामध्ये त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर प्रकाश टाकला. दरम्यान, राज यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत ‘आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकले’, असेही म्हटले.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईबाबत मनसेने अनेक आंदोलने केली. या मुद्द्यावरुन राज ठाकरे सातत्याने सरकारला धारेवर धरले. गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग बनवण्याचे काम सुरु आहे, मात्र तो अद्याप तयार झालेला नाही. त्याचे काम अपूर्णच आहे.

Raj Thackeray On Goa-Mumbai expressway
Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2007 मध्ये सुरु झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. 2007 नंतर एवढी सरकारे आली पण महामार्गाचे काम होऊ शकले नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली होती. रस्त्यांच्या दुरावस्थेवर ते म्हणाले होते की, केवळ कोकणातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी 8 तास लागतात. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Raj Thackeray On Goa-Mumbai expressway
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडण्याबाबत राज ठाकरे यांनी येथे सुरु असलेले जमिनीचे व्यवहार हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले होते. कोकणी लोकांच्या जमिनी कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. जेव्हा या महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जातील. त्यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एकदा रस्ता झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव गगनाला भिडतात हे समजून घ्या, असेही राज यांनी यापूर्वी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com