
पणजी: नवीन शिक्षण धोरणाच्या ‘उल्लास’ योजनेअंतर्गत राज्यात ज्येष्ठ नागरिकांना लिहायला आणि वाचायला शिकविण्यात आले. राज्यातील ९९.७२ टक्के नागरिक साक्षर झाले आहेत. आम्ही केवळ साधनसुविधा विकासावर भर दिला नसून मानव संसाधनाच्या विकासासाठीही प्रयत्नरत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कला अकादमी येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्याला साक्षर करण्याचे उद्दिष्ट सरकारने पूर्ण केले असून आता राज्य क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.
केंद्र सरकारने २०३० पूर्वी सर्व राज्यांना साक्षर राज्य घोषित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्या अनुषंगाने ‘उल्लास’ योजनेअंतर्गत राज्यात साक्षरता मोहीम राबविली. मराठी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजीतून ज्येष्ठांना शिकविले. त्यांच्या परीक्षा घेतल्या.
काही ज्येष्ठ नागरिकांना आता शिकणे शक्य नाही. आरोग्य तसेच इतर समस्या आहेत. त्यामुळे ९९.७२ टक्के नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे मेघना शेटगावकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.