Goa Winter Session: 'कुशावती' जिल्हा म्हणजे 'विकसित गोवा 2037' कडे टाकलेले मोठे पाऊल! राज्यपालांचे प्रतिपादन

Governor Speech Goa Winter Session: नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 'कुशावती' जिल्ह्याचे स्वागत करत, या निर्णयाला प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हटले
Goa Assembly Session
Goa Assembly SessionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Winter Session Kushavati district: गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आपल्या अभिभाषणात प्रस्तावित 'कुशावती' जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 'कुशावती' जिल्ह्याचे स्वागत करत, या निर्णयाला प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हटले आहे.

आर्थिक प्रगती आणि रोजगाराला मिळणार चालना

या निर्णयामुळे केवळ प्रशासकीय कामात सुलभता येणार नाही, तर राज्याच्या संतुलित प्रादेशिक विकासालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'विकसित भारत २०३७' या गोव्याच्या दूरदृष्टीला अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यपालांनी सांगितले की, नवीन जिल्हा मुख्यालय स्थापन झाल्यामुळे तिथे विविध सरकारी विभाग आणि अधिकाऱ्यांची कार्यालये येतील. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. तसेच, जिल्हा स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे स्थानिक छोट्या-मोठ्या व्यवसायांना बळकटी मिळेल, ज्यामुळे या परिसराचा आर्थिक विकास वेगाने होईल.

Goa Assembly Session
Goa Winter Session: हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले! पाच दिवस, धडाकेबाज चर्चा

नागरिक-केंद्रित प्रशासन आणि वेळेची बचत

नव्या जिल्ह्याच्या निर्मितीचा सर्वात मोठा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. राज्यपालांच्या मते; जिल्हा स्तरावरील सरकारी सेवा आता नागरिकांच्या जवळ उपलब्ध होतील, जिल्हा मुख्यालयापर्यंत जाण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, सरकारी कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवता येतील तसेच प्रशासकीय कामात अधिक पारदर्शकता येऊन नागरिक-केंद्रित कारभार सुरू होईल.

स्थानिक प्रश्न आणि पर्यावरणावर विशेष लक्ष

'कुशावती' जिल्ह्यामुळे स्थानिक समस्यांकडे अधिक बारकाईने पाहणे शक्य होणार आहे. विशेषतः पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरणाचे रक्षण आणि गोव्याच्या ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देणे, या गोष्टींवर जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष केंद्रित होईल. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखून विकास साधणे सोपे जाईल.

शेवटी, राज्यपाल म्हणाले की, हा निर्णय गोव्याला प्रगत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पारदर्शक प्रशासन आणि लोकांच्या दारापर्यंत पोहोचणारी सरकारी सेवा हेच खऱ्या सुशासनाचे लक्षण असून 'कुशावती' जिल्हा हे उद्दिष्ट साध्य करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com