
CM Pramod Sawant Goa Tourism
पणजी: राज्यातील पर्यटन घटत असल्याच्या दाव्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबई येथे बोलताना फेटाळून लावले. काही समाज माध्यमावरील प्रभावशाली व्यक्ती जाणूनबुजून गोव्याबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोवा हे अजूनही सुरक्षित आणि स्वच्छ पर्यटनस्थळ आहे आणि येथे पर्यटनामध्ये २१ टक्के वाढ झाली आहे. "गेल्या वर्षी आठ दशलक्ष पर्यटक गोव्यात आले होते, तर यावर्षी ही संख्या दहा दशलक्ष झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, लोकप्रिय पर्यटनस्थळांवरील गर्दी कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे नवीन वर्षाच्या सणावेळी समुद्रकिनारे रिकामे वाटले. ‘गोवा हे स्वतः एक ब्रँड आहे आणि येथे सूर्य, वाळू आणि समुद्र अनुभवण्यासाठी पर्यटक नेहमीच येतात, असे त्यांनी सांगितले. प्रवाशांनी फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सरकारमान्य वेबसाइट्सद्वारेच बुकिंग करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘विकसित गोवा’ उद्दिष्टाबाबत ते आशावादी असून, राष्ट्रीय उद्दिष्टापेक्षा दहा वर्षे आधी म्हणजे २०३७ पर्यंत गोवा हे उद्दिष्ट गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाच वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचे यशाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाला आणि स्वतःच्या अंगभूत नेतृत्व गुणांना दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.