Goa Politics: भाजपकडून खोटे दावे करून मतदारांना वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचा आरोप
Goa Election Controversy : भाजपने खरे मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यांवरून कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचा खोटा दावा करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे.
माध्यमांशी बोलताना पक्षाचे नेते सावियो कुतिन्हो म्हणाले की, एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला आहे, ज्यात मतदारयादीतून नावे वगळण्यासाठी निर्धारित फॉर्म ७ द्वारे आक्षेप दाखल केले होते. यापैकी अनेक आक्षेप चुकीचे होते आणि त्यांचा उद्देश वैध मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे हा होता.
कुतिन्हो यांनी दावा केला की, हे आक्षेप भाजपच्या बूथस्तरीय एजंटांनी दाखल केले होते आणि या अर्जांमध्ये लक्ष्य केलेले अनेक मतदार आजही त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यांवर राहत आहेत. ते म्हणाले की, अशा कृती लोकशाही प्रक्रियेला कमजोर करतात आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात.
कॉंग्रेसने त्यांना खोटे आक्षेप संबोधून यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कुतिन्हो यांनी निवडणूक आयोगाला या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आणि फॉर्म ७ मध्ये चुकीची माहिती सादर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी खोटे आक्षेप दाखल केल्याबद्दल भाजपच्या बूथस्तरीय एजंटांवर कारवाईची मागणी केली आहे. बाधित मतदारांची नावे तत्काळ पूर्ववत करावीत आणि भविष्यात मतदारनोंदणी व आक्षेप प्रक्रियेचा गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणीही कुतिन्हो यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

