Goa Eco Sensitive Zone: आम्ही करायचे काय..? म्हाऊस ग्रामसभेत अतिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

Mhaus Panchayat: परिसरातील अनेक गावे शेती, बागायतीवर अवलंबून आहेत त्यामुळेअतिसंवेदनशील क्षेत्र झाल्यास तेथे जाणे-येणे कठीण होईल असा दावा
Mhaus Panchayat: परिसरातील अनेक गावे या शेती, बागायतीवर अवलंबून आहेत त्यामुळेअतिसंवेदनशील क्षेत्र झाल्यास तेथे जाणे-येणे कठीण होईल असा दावा
Goa Eco Sensitive ZoneDainik Gomantak
Published on
Updated on

Mhaus Gramsabha

वाळपई: म्हाऊस पंचायतीमधील गावे अतिसंवेदनशील प्रस्तावमुळे संकटात आली असून अतिसंवेदनशील क्षेत्र मंजूर झाले तर आम्ही करायचे काय? हा प्रश्‍न आहे. आमचा या प्रस्तावाला विरोध असून ही गावे वगळावी, अशी माऊसच्या खास ग्रामसभेत मागणी करण्यात आली.

यावेळी सरपंच सुलभा देसाई, उपसरपंच राधीका सावंत, पंच कांता गावस, प्रिती गावकर, गुरुदास गावस, पंचायत सचिव संदीप हल्याळी तसेच इतर ग्रामस्थांची उपस्थित होते

यावेळी पंचायत सचिव संदिप हल्याळी यांनी उपस्थितांसमोर अति संवेदनशीलविषयी विषय मांडला. त्यात सविस्तर चर्चा करुन ठराव घेण्यात आला.

Mhaus Panchayat: परिसरातील अनेक गावे या शेती, बागायतीवर अवलंबून आहेत त्यामुळेअतिसंवेदनशील क्षेत्र झाल्यास तेथे जाणे-येणे कठीण होईल असा दावा
Goa Eco Sensitive Zone: १०८ पैकी '४० गावे' वगळण्यासाठी धडपड सुरु! गोवा सरकार राबवणार केरळचा पॅटर्न

सरपंच सुलभा देसाई म्हणाल्या, दाबे, म्हाऊस, झर्मे, नागवे कोपार्डे गावांचा समावेश झाल्यास येथील शेतीवर परिणाम होईल. ही गावे जर अतिसंवेदनशील क्षेत्रात गणली गेली, तर आमच्यावर मोठे संकट येणार आहे. यासाठी आमचा या प्रस्तावाला विरोध असून सरकारने आमची सर्व गावे अतिसंवेदनशील क्षेत्रामधून वगळावी. माऊस परिसरातील अनेक गावे या परिसरातील शेती, बागायतीवर अवलंबून आहेत. अतिसंवेदनशील क्षेत्रात ही गावे आल्यास तेथे जाणे-येणे कठीण होईल. रोजच्या जगण्यावरच निर्बंध येतील, त्यासाठी ही गावे वगळावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com