
पणजी: इंग्रजी राजवटीविरोधात लढताना महात्मा गांधी यांनी देशाला जो अहिंसेचा व शांतीचा मार्ग दाखवला. तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला.
या महात्मा गांधी आणि शास्त्री दोन्ही महान व्यक्तींनी देशाला विचार दिला, त्यांचे विचार सध्याच्या हुकूमशाही सरकारच्या काळात मागे पडत आहेत, हे दुःखाची बाब असल्याचे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.
जुने गोवेतील महात्मा गांधींच्या पुतळा परिसरात आज दोन्ही महान व्यक्तींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी ते गेले होते. महात्मा गांधींच्या पुतळ्यास आणि शास्त्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांकडे बोलत होते.
ते म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. परंतु हे सरकार हुकूमशाहीसारखे वागत आहे. देशाला हुकूमशाही आणि धमकीच्या धोक्यांचा सामना करावा लागत असताना, सोनम वांगचुक सारख्या व्यक्तींना दडपले जात असताना, गांधीवादी तत्त्वांसह न्यायासाठी लढाईत एकत्र येण्याची नितांत गरज आहे.
सकाळी काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख, तुलियो डिसोझा यांच्यासह इतर मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.