'काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपने गोव्यात तृणमूल काँग्रेस व ‘आप’ला आणले'

असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी केला.
Congress
CongressDainik Gomantak

पणजी: अल्पसंख्याकांच्या समस्या सोडविण्यात भाजपला अपयश आले आहे. भाजपने गेल्या दहा वर्षात अल्पसंख्यांकासाठी काहीही केलेले नाही. काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपने गोव्यात तृणमूल काँग्रेस व ‘आप’ला आणले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी केला. राज्यात अल्पसंख्यांक आयोगाची गरज आहे. काँग्रेस (Congress) सत्तेवर आल्यावर हा आयोग स्थापन करण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. (BJP has brought TMC and AAP in Goa to beat Congress)

Congress
गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

पणजी (Panaji) काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रतापगढी यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नझीर खान, फिरोज खान व इर्फान उपस्थित होते. प्रतापगढी म्हणाले, अजूनही मडगावातील कब्रस्तानचा प्रश्‍न भाजपने सोडवलेला नाही. हे सरकार सपयशी अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले.

Congress
गोव्यात निवडणूक आयोगाची 80 भरारी पथके सक्रिय

प्रलंबित प्रश्न सोडवू

राज्यातील कब्रस्तानचे प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. अल्पसंख्याक आयोग स्थापन करणे याही समस्या सोडवायला हव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजप सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. आम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. ते नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे प्रतापगढी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com