

पणजी: आम आदमी पक्षाने जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत राज्यात सर्वत्र उमेदवार उभे केल्यामुळे बहुपक्षीय लढती झाल्या आणि त्याचा फायदा अनेक जागांवर भाजपविरोधी मतांचे विभाजन होण्यात झाला, ज्यामुळे भाजपच्या मोठ्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे गोमंतकीय जनतेने ‘आप''च्या फुटीर राजकारणाला शहाणपणाने नाकारले आहे. यावरून भाजपची खरी ‘बी-टीम’ कोण आहे, हे स्पष्ट होते, अशी परखड टीका गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.
ठाकरे यांनी मंगळवारी ‘एक्स''या समाजमाध्यमाच्या व्यासपीठावरून पोस्ट करीत ‘आप’च्या एकला चलोच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. काँग्रेसबरोबर युती न करण्याचे सांगत एकला चलोची भूमिका घेणाऱ्या आणि सतत काँग्रेसवर टीका करण्याचे काम ‘आप’च्या नेत्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने केले.
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी ४०च्यावर जागांवर उमेदवार दिले, पण एकच ठिकाणी त्यांना विजय मिळविला. तर उलट दुसऱ्या बाजूला ज्या काँग्रेसला ते हिणवत राहिले, पण काँग्रेसने २०२० च्या तुलनेत ४ ऐवजी यावेळी १० जागांवर विजय मिळविला. अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना दोन किंवा तीन क्रमांकाची मते मिळाली आहेत.
ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत ‘आप’ची भूमिका उघड झाली. गोव्याच्या जनतेने ''आप''च्या फुटीर राजकारणाला शहाणपणाने नाकारले आहे आणि खऱ्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला बळकट केले आहे. प्रचारादरम्यान, ‘आप''चे नेते अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनी काँग्रेसला जोरदार लक्ष्य केले, वारंवार ‘भाजपची बी-टीम' म्हटले आणि सत्ताधारी पक्षाला मदत करत असल्याचा आरोप केला. परंतु निकालांनी एक वेगळीच कहाणी सांगितली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.