
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, कारण भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहेत. या मालिकेत केवळ विजयाचीच नव्हे तर विराट कोहलीच्या विश्वविक्रमाच्या शतकाचीही चर्चा रंगली आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ८२ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्यापैकी ५१ एकदिवसीय सामन्यांत, ३० कसोटी सामन्यांत, आणि १ टी२० सामन्यात.
जर कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत आणखी एक शतक झळकावले, तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५२ शतकांचा टप्पा गाठेल. यामुळे तो एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल.
सध्याच्या घडीला विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ शतकांसह बरोबरीत आहेत. सचिनने एकूण १०० आंतरराष्ट्रीय शतके (४९ एकदिवसीय + ५१ कसोटी) केली होती. त्यामुळे, जर कोहलीने या मालिकेत एक शतक झळकावले, तर तो सचिनला मागे टाकत एकाच स्वरूपात सर्वाधिक शतके करणारा पहिला खेळाडू बनेल. हा विक्रम कोहलीच्या कारकिर्दीतील आणखी एक ऐतिहासिक क्षण ठरेल.
भारतीय क्रिकेटचा आधुनिक दिग्गज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीने विशेष छाप सोडली आहे. कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० एकदिवसीय सामने खेळले असून ४८ डावांत त्याने तब्बल २,४५१ धावा केल्या आहेत.
त्याची सरासरी ५४.४७ तर स्ट्राईक रेट ९३.६९ इतका प्रभावी आहे. या काळात त्याने ८ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.