Vasudev Balwant Phadke: नोकरीला लाथ मारली, अन्यायाविरुद्ध लढा उभारला, इंग्रजांना सळो की पळो केलं, पण फंद फितुरीनं घात केला; वाचा वासुदेव बळवंत फडकेंची संघर्षगाथा!

Vasudev Balwant Phadke Jayanti 2025: वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी महाराष्ट्रातील शिरढोणे येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंत आणि आईचे नाव सरस्वती बाई होते.
Vasudev Balwant Phadke Jayanti 2025
Vasudev Balwant PhadkeDainik Gomantak
Published on
Updated on

Vasudev Balwant Phadke Jayanti 2025: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हजारो ज्ञात-अज्ञात वीरांनी आपले सर्वस्व अर्पण केले. आपण अनेक थोर देशभक्तांना ओळखतो, पण अशीही मोठी संख्या आहे, ज्यांनी आपले बलिदान दिले; पण ते प्रसिद्धीपासून दूरच राहिले. अशाच गुमनाम नायकांपैकी एक म्हणजे वासुदेव बळवंत फडके (Vasudeo Balwant Phadke). सुरुवातीला त्यांनी इंग्रजांची नोकरी केली, पण इंग्रजांनी सामान्य जनतेवर चालवलेले अत्याचार पाहून त्यांचे मन विचलित झाले. याच कारणामुळे त्यांनी नोकरी सोडून स्वातंत्र्याच्या लढ्याची सुरुवात केली आणि इंग्रजी सत्तेला हादरवून टाकले.

आज 4 नोव्हेंबर रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने, आपण भारताचे (India) पहिले क्रांतीवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासुदेव बळवंत फडके यांची प्रेरणादायी कहाणी बद्दल जाणून घेऊया...

Vasudev Balwant Phadke Jayanti 2025
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

संपन्न कुटुंबात जन्म आणि शिक्षण

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी महाराष्ट्रातील शिरढोणे येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंत आणि आईचे नाव सरस्वती बाई होते. त्यांचे कुटुंब संपन्न होते आणि त्यांचे बालपण कल्याण येथे गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इंग्रजांच्या राजवटीत 60 रुपये मासिक वेतनात नोकरी पत्करली. वासुदेव यांचे आजोबा अनंतराव हे कर्नाळा किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते, जो किल्ला 1818 मध्ये इंग्रजांनी पाडला होता. वासुदेव यांच्या कामावर खूश होऊन त्यांच्या बॉसने त्यांना बढतीची शिफारस केली आणि त्यांना पुण्यात मिलिटरी फायनान्स ऑफिसमध्ये नियुक्ती मिळाली. पुण्यात ते सादशिव पेठेत राहत होते.

अन्यायाविरुद्ध उफाळून आला संताप

नोकरी करत असले तरी वासुदेव यांना इंग्रजांची जुलमी सत्ता आवडत नव्हती. त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध प्रचंड रोष भरलेला होता. हा रोष तेव्हा पराकोटीला पोहोचला, जेव्हा त्यांची आई मरणासन्न असताना त्यांना सुट्टी मिळाली नाही. त्यानंतर आईचे निधन झाले, तरीही सुट्टीसाठी त्यांना संघर्ष करावा लागला. पण, त्यांच्या आईच्या पहिल्या वर्षश्राद्धासाठी त्यांना जेव्हा सुट्टी नाकारण्यात आली, तेव्हा मात्र वासुदेव यांचा संताप अनावर झाला. हा अपमान आणि समाजावरील इंग्रजांचे अत्याचार पाहून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पद्धतीने स्वातंत्र्य आंदोलन सुरु केले.

Vasudev Balwant Phadke Jayanti 2025
Rahul Gandhi: राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरले; 'मतदार याद्यांमध्ये जाणूनबुजून फेरफार...'

पुण्यातील वैचारिक प्रेरणा

हा तो काळ होता, जेव्हा पुण्यात (Pune) अनेक राजकीय आणि सामाजिक संघटना काम करत होत्या. सार्वजनिक सभांमधून इंग्रजांच्या अत्याचारांवर चर्चा सुरु झाली होती. याच काळात वासुदेव यांनी न्यायमूर्ती माधवराव रानडे आणि दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या दिग्गजांची भाषणे ऐकली, ज्यामुळे त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. पुण्यात असताना ते सकाळी-संध्याकाळी आखाड्यांमध्ये जाऊन कुस्तीचे डावपेच शिकत होते. याच आखाड्यात महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले हे देखील येत असत, असे सांगितले जाते. वासुदेव यांची व्यायामशाळा जंगलातील एका मंदिराच्या आवारात होती, जिथे शस्त्रास्त्रांचा सरावही केला जाई.

लहूजी राघोजी साळवे यांची मोलाची साथ

वासुदेव यांच्या जीवनात लहूजी राघोजी साळवे यांचे आगमन झाले. साळवे यांनी त्यांच्या देशभक्तीच्या भावनेला आणखी चालना दिली. साळवे हे आपल्या शिष्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत असत आणि बाळ गंगाधर टिळक आणि ज्योतिबा फुले हे देखील त्यांच्या शिष्यांमध्ये सामील होते, असे सांगितले जाते. 1870 ते 1878 या काळात दख्खन प्रदेशात भीषण दुष्काळ पडला. यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते आणि त्यात इंग्रज त्यांचे शोषण करत होते. यामुळे वासुदेव फडके यांचे मन पूर्णपणे विचलित झाले आणि त्यांनी इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा विचार सुरु केला.

Vasudev Balwant Phadke Jayanti 2025
Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

क्रांतिकारकांचे संघटन

वासुदेव फडके यांनी शांतपणे पुणे आणि आजूबाजूच्या भागातील रामोशी, कोळी, भिल्ल आणि धनगर यासह सर्व भटक्या जमातींना एकत्र आणण्यास सुरुवात केली आणि ते यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. त्यांनी एक सेना तयार केली, ज्यात सुमारे तीनशे लोक इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी तयार झाले. या सेनेच्या मदतीने त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोर्चा उघडला. आंदोलनाला निधी मिळावा यासाठी त्यांनी इंग्रजांच्या आणि सावकारांच्या तिजोऱ्या लुटल्या. काही दिवसांसाठी वासुदेव फडके यांच्या या सेनेने पुणे शहराचा काही भाग आपल्या नियंत्रणात घेतला होता, ज्यामुळे त्यांची प्रसिद्धी दूरवर पसरली. महाराष्ट्रातील किमान सात जिल्ह्यांपर्यंत त्यांच्या सेनेचा प्रभाव पोहोचला होता.

मे 1879 मध्ये एका सरकारी इमारतीत इंग्रज अधिकारी वासुदेव फडके यांच्या सेनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी बैठक घेत असताना, फडके आपल्या साथीदारांसह तिथे पोहोचले आणि त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला करुन इमारतीला आग लावली.

Vasudev Balwant Phadke Jayanti 2025
Rahul Gandhi: 'व्हिडिओ प्रूफ' ते 'नरेंद्र..सरेंडर'!! सुरक्षा दलांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह का? राहुल गांधींच्या भूमिकेवर तीव्र टीका

50 हजारांचे इनाम आणि पकड

वासुदेव फडके यांची दहशत इतकी वाढली की, इंग्रजांनी त्यांना जिंदा किंवा मुर्दा पकडण्यासाठी त्या काळात 50 हजार रुपयांचे मोठे इनाम जाहीर केले. याला आव्हान देत दुसऱ्याच दिवशी मुंबईत एक दुसरे पोस्टर आढळले, ज्यावर वासुदेव फडके यांची स्वाक्षरी होती. या पोस्टरमध्ये त्यांनी रिचर्ड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याचे शीर कापून आणणाऱ्याला 75 हजार रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केली होती. यामुळे इंग्रज सरकारमध्ये फडके यांची दहशत आणखी वाढली आणि पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरु केला. अखेरीस एका देशद्रोहीने इंग्रजांना माहिती पुरवल्यामुळे 20 जुलै 1879 रोजी वासुदेव फडके यांना अटक करण्यात आली.

Vasudev Balwant Phadke Jayanti 2025
Rahul Gandhi: 'आपण भाजप, RSS आणि भारतीय राज्याशी लढतोय'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद होणार?

वासुदेव यांना बंदी बनवल्यानंतर विद्रोह उसळू नये, या भीतीने इंग्रजांनी त्यांना घाईघाईत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि 1880 च्या सुरुवातीला त्यांना येमेन देशातील अदन येथील तुरुंगात पाठवले.

Vasudev Balwant Phadke Jayanti 2025
Rahul Gandhi: आरक्षणाच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर; म्हणाले, ''त्यांचा अहंकार आणि मूर्खपणा...''

अदन तुरुंगात हौतात्म्य

वासुदेव फडके हे अदन तुरुंगातून पळूनही गेले होते, पण रस्ता चुकल्यामुळे त्यांना पुन्हा पकडण्यात आले. तुरुंगात असताना त्यांना टीबी या गंभीर आजाराने ग्रासले आणि शेवटी 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांनी अदनच्या तुरुंगातच अखेरचा श्वास घेतला आणि हौतात्म्य पत्करले. वासुदेव बळवंत फडके हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते भारतातील सशस्त्र क्रांतीचे जनक होते. त्यांनी केलेल्या संघर्षानेच पुढील पिढीतील क्रांतिकारकांना प्रेरणा दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com