
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये कारवाई केली. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याने त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. या कारवाईनंतर, पाकिस्तानने गुरुवारी जम्मू, पठाणकोट आणि इतर काही ठिकाणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पूर्णपणे हाणून पाडला.
भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे एक मोठे विधान समोर आले आहे. रोहित शर्माने भारतीय सैन्याचं कौतुक केलं आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, "भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाचा खूप अभिमान वाटतो. आपले सैनिक आपल्या देशाच्या अभिमानासाठी खंबीरपणे उभे आहेत. प्रत्येक भारतीयाने जबाबदार राहणे आणि कोणत्याही बनावट बातम्या पसरवणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे टाळणे महत्वाचे आहे."
कसोटीतून निवृत्तीची घोषणा
उल्लेखनीय म्हणजे रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले होते. रोहितची निवृत्तीची घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा टीम इंडिया पुढील महिन्यात कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे.
गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देणाऱ्या रोहितने यावर्षी टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवून दिले. कसोटी क्रिकेटला निरोप दिल्यानंतर, हिटमॅन आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिसणार आहे.
२०२७ चा विश्वचषक जिंकण्याचे ध्येय
रोहित शर्माने कर्णधार म्हणून २ आयसीसी ट्रॉफी (टी२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५) जिंकल्या आहेत, परंतु आतापर्यंत तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे विश्वचषक विजेतेपद जिंकू शकलेला नाही. २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकणे हे त्याचे ध्येय असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.