India Tourism: भारत गरीब नाही, दुर्लक्षित...! 'या' खजिन्यामुळे भारत बनू शकतो जगातील पर्यटन महासत्ता; असं का म्हणाले जावेद अख्तर?

Javed Akhtar: आनंद रंगनाथन यांच्या वक्तव्यावर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार यांनी प्रतिक्रिया दिली. अख्तर यांनी भारताची अफाट भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता स्पष्ट केली.
 javed Akhtar News
javed AkhtarDainik Gomantak
Published on
Updated on

World Tourism Day: भारताकडे 8,000 वर्षांची समृद्ध संस्कृती आणि अतुलनीय नैसर्गिक सौंदर्य असूनही भारत जागतिक पर्यटनात खूप मागे आहे. पॅरिस या एका शहरात जेवढे विदेशी पर्यटक येतात, त्यापेक्षा कमी पर्यटक संपूर्ण भारताला भेट देतात, या वस्तुस्थितीवर प्रसिद्ध लेखक आनंद रंगनाथन यांनी चिंता व्यक्त केली. रंगनाथन यांच्या वक्तव्यावर गीतकार जावेद अख्तर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

आनंद रंगनाथन यांचा कठोर सवाल

जागतिक पर्यटन दिनानिमित्त (World Tourism Day) बोलताना आनंद रंगनाथन यांनी भारताच्या पर्यटन क्षमतेवर थेट आकडेवारीसह प्रकाश टाकला. रंगनाथन म्हणाले, "आपल्याकडे 8,000 वर्षांची संस्कृती जगाला दाखवण्यासाठी असतानाही पॅरिस सारखे एक शहर दरवर्षी 25 दशलक्ष (2.5 कोटी) विदेशी पर्यटक आकर्षित करते, तर भारताला केवळ 11 दशलक्ष (1.1 कोटी) पर्यटक भेट देतात."

रंगनाथन यांनी या परिस्थितीवर टीका करताना म्हटले की, "जी संधी सर्वात सोपी आणि सहज उपलब्ध आहे, ती आपण साधत नाहीत. उलट आपण त्या संधीला दुर्लक्षित करत आहोत." भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचा योग्य वापर करुन पर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 javed Akhtar News
Goa Tourism: गोवा फक्त 10 हजारांत! विमान तिकीट, हॉटेल्स आणि कोकणी जेवणाचा आनंद घ्या; सफर करा अविस्मरणीय

आनंद रंगनाथन यांच्या वक्तव्यावर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार यांनी प्रतिक्रिया दिली. अख्तर यांनी भारताची अफाट भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता स्पष्ट केली. अख्तर म्हणाले, "मी तुमच्याशी अधिक सहमत होऊ शकत नाही. पर्यटनाच्या बाबतीत भारत खूप श्रीमंत देश आहे."

ते पुढे म्हणाले की, "अमेरिकासारखा खंडप्राय देश वगळल्यास जगातील कोणताही देशात भारतासारखी विविधता नाही. भारताच्या भूभागात बर्फाच्छादित पर्वत, उष्णकटिबंधीय जंगले, विस्तीर्ण वाळवंट, वन्यजीव आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वालुकामय किनारा आहे."

 javed Akhtar News
Tourism In Konkan: एक इंजीनिअर कोकणात का रमला? कोकणातल्या बदलत्या पर्यटनाकडे कसा पाहतो 'रानमाणूस'?

दुर्लक्षित ऐतिहासिक खजिना

जावेद अख्तर यांनी भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खजिन्यावरही जोर दिला. "ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याकडे बुद्ध आणि गांधींशी संबंधित स्थळे, ताजमहल, राजस्थानचे भव्य राजवाडे, दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरे, खजुराहो, अजिंठा-वेरुळ यांसारखी स्थळे आहेत आणि ही यादी संपणारी नाही," असे ते म्हणाले.

अखेरीस, दोन्ही मान्यवरांनी यावर सहमती दर्शवली की, अशा अतुलनीय खजिन्याकडे भारताने सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केले आहे. योग्य पायाभूत सुविधा आणि धोरणे राबवल्यास, भारत जगातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र बनून आर्थिक महासत्ता बनू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com