Asia Cup 2025: क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी! 'आशिया कप' रद्द होणार? भारत आणि श्रीलंकेच्या 'या' निर्णयाने स्पर्धेवर टांगती तलवार

Asia Cup: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने २४ जुलै रोजी ढाका येथे होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
Asia Cup 2025
Asia Cup 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेवर रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने २४ जुलै रोजी ढाका येथे होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्पर्धा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टेलिकॉम एशिया स्पोर्टच्या वृत्तानुसार, आशिया कप सुरू होण्यास अवघे दोन महिने बाकी असताना BCCI आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे स्पर्धा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, प्रमुख सदस्य देश बैठकीला हजर राहणार नसल्यामुळे स्पर्धा रद्द होण्याची चर्चा सुरू आहे.

Asia Cup 2025
Goa: भंगार वाहने विकली, गोवा सरकारला 1 कोटींचा महसूल; 170 वाहनांची विक्री, 135 बोलीदारांचा सहभाग

BCCIने ढाकामध्ये होणाऱ्या ACC बैठकीवर आक्षेप नोंदवला आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे सध्या बांगलादेशमधील अस्थिर राजकीय परिस्थिती. या पार्श्वभूमीवरच BCCIने बांगलादेश दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळेच ACCच्या बैठकीत उपस्थित राहण्यास BCCIने नकार दिला आहे.

ACCने बैठकीच्या नियोजित वेळेनुसारच बैठक घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, भारत आणि श्रीलंका सहभागी नसल्यास बैठकीच्या निर्णयांवर प्रभाव पडू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, ACCने BCCIकडे औपचारिक चौकशी केली आहे की भारत स्पर्धा आयोजित करण्यास इच्छुक आहे का. याच संदर्भात प्रायोजक आणि प्रसारकही संभ्रमात आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB)ने भारताविरुद्धचे सामने तिसऱ्या देशात खेळवण्याच्या हायब्रिड मॉडेलला मान्यता दिली आहे. मात्र, भारत सरकारची मंजुरी मिळेपर्यंत BCCI कोणताही निर्णय घेत नाही, असे संकेत आहेत. ACCने सदस्य देशांना १५ दिवसांत अंतिम निर्णय घेण्यास सांगितले आहे.

Asia Cup 2025
Goa Crime: टॅक्‍सीचालकाला बाहेर ढकलले, धारदार शस्त्रांनी चढवला हल्ला; पेडणे येथील घटना, महाराष्ट्रातील 6 जणांवर गुन्हा दाखल

भारत आणि श्रीलंका मालिका

योगायोगाने, BCCI आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड ऑगस्टमध्ये मर्यादित षटकांची द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे ACC बैठकीस प्राधान्य देण्यात त्यांनी रस दाखवलेला नाही. यामुळेच आशिया कप २०२५ चा मार्ग अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

BCCIची पुढील भूमिका काय?

BCCIच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्याकडे तीन-चार क्रिकेट बोर्डांकडून द्विपक्षीय मालिकांचे प्रस्ताव आले आहेत. आमच्या संघाला निष्क्रिय ठेवण्यात काही अर्थ नाही.” त्याचबरोबर, BCCI अजूनही आशिया कपचं यजमानपद राखण्याची इच्छा बाळगते. मात्र, त्याआधी भारत सरकारकडून परवानगी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आशिया कप रद्द होण्याची शक्यता

जर ACCने भारत आणि श्रीलंकेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले, तर BCCI आशिया कपमधून माघार घेऊ शकतो. PCBच्या अध्यक्षांकडे सध्या ACCच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे, त्यामुळे धोरणात्मक मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. सध्याच्या घडीला स्पर्धेचे आयोजन UAEमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com